बायकोनं सोडल्यावर संन्यास घेतला, आता आश्रमाच्या मागे सापडली बॉडी, साधूला कुणी संपवलं?

मुंबई तक

बायको सोडून गेल्यानंतर संन्यास घेतलेल्या एका साधूची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. गंगेश्वरी महाराज असे या उज्जैनमधील साधूचे नाव होते.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

हत्या करुन आश्रमाच्या मागे पुरली बॉडी

point

साधूच्या हत्येनं खळबळ

point

आरोपी कोण?

Crime News : बायको सोडून गेल्यानंतर संन्यास घेतलेल्या एका साधूची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मध्य प्रदेशातील उज्जैन परिसरातील ही घटना आहे. गंगेश्वरी महाराज असे मृत साधूचे नाव आहे. त्यांचे मूळ नाव सुनिल जोशी असे होते. या साधूच्या मृत्यूनंतर चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूनंतर तब्बल 10 दिवसांनी समाधी खोदून त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. महाराजांचा मृत्यू नैसर्गिक नसून त्यांची हत्या करण्यात आल्याचा संशय त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला.

8 दिवसांपूर्वीच समाधी

आठ दिवसांपूर्वी गंगेश्वरी महाराज यांनी आपल्या भावांशी फोनवर संवाद साधला होता. ते लवकरच आपल्या आईला एका धार्मिक यात्रेवर नेण्याच्या तयारीत होते. मात्र, फोनवर बोलत असतानाच अचानक महाराजांचे कोणासोबत तरी कडाक्याचे भांडण सुरू झाले, ज्याचा आवाज त्यांच्या भावांनीही ऐकला. त्यानंतर लगेचच फोन कट झाला आणि बंद झाला. काहीतरी अघटीत घडल्याच्या शंकेने जेव्हा भाऊ त्यांना शोधत उज्जैनमधील कुटीत पोहोचले, तेव्हा त्यांना धक्काच बसला. तिथे त्यांना सांगण्यात आले की महाराजांचा मृत्यू झाला असून, 8 दिवसांपूर्वीच आश्रमाच्या मागे त्यांना समाधी देण्यात आली.

हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यातील 'या' ठिकाणी ऊन तर लवकर पाऊस लावणार हजेरी

कुटुंबाला का कळवले नाही?

आपल्याला कोणतीही पूर्वकल्पना न देता घाईघाईने अंत्यसंस्कार उरकण्यात आल्यामुळे भावांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. कुटुंबीयांनी या प्रकरणात थेट हत्येचा आरोप करत तीन गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. जर महाराजांचा मृत्यू नैसर्गिक होता, तर त्यांच्या कुटुंबीयांना न कळवता इतक्या घाईघाईने समाधी का देण्यात आली? तसेच, महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे वैयक्तिक सामान आणि त्यांची मोटारसायकल कुटीतून गूढ रितीने गायब कशी झाली? फोन बंद होण्यापूर्वी झालेला वाद हे स्पष्ट करतो की आश्रमात नक्कीच काहीतरी गैरप्रकार घडला होता.

हे ही वाचा : 'षडयंत्र रचणारे कोण? मी नंतर बोलेन..', राणाजगजीतसिंह पाटील काय म्हणाले?

बायकोने सोडल्यानंतर घेतला संन्यास

या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेऊन 20 जून रोजी प्रशासकीय परवानगी मिळाल्यानंतर, पोलिसांच्या उपस्थितीत समाधी खोदण्यात आली आणि मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांनी सांगितले की, कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल. सुनील जोशी यांनी काही वर्षांपूर्वी पत्नीने सोडल्यामुळे सांसारिक जीवनाचा त्याग केला होता आणि उज्जैनमध्ये संन्यास घेतला होता. सध्या पोलीस कुटीशी संबंधित लोकांची चौकशी करत असून महाराजांचे कॉल रेकॉर्ड्स तपासत आहेत.
 

हे वाचलं का?