Shivaji Maharaj: जयदीप आपटेने मुंबई Tak सांगितलेलं 'मालवणला निघालोय', कुठे आणि कसा झाला फरार?
Jaydeep Apte Abscond: मुंबई Tak ला फोनवरून दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये जयदीप आपटे याने हे सांगितलं होतं की, तो मालवणला निघाला आहे. मात्र, आता 48 तास उलटून गेल्यानंतरही आरोपी जयदीप आपटे हा पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेविरोधात गुन्हा

जयदीप आपटे नेमका कसा झाला फरार?

जयदीप आपटे 48 तासानंतरही पोलिसांना सापडलेला नाही
Jaydeep Apte: मुंबई: सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर साधारण 8 महिन्यांपूर्वी नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आलं होतं. पण हाच पुतळा दोन दिवसांपूर्वी अचानक कोसळला. ज्यानंतर पुतळा तयार करणारा कल्याणचा शिल्पकार जयदीप आपटे याच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला. आता हाच जयदीप आपटे मागील 48 तासांपासून फरार झाला आहे. पण घटनेच्या दिवशी मुंबई Tak ला फोनवरून दिलेल्या प्रतिक्रियेत जयदीप आपटेने आपण मालवणाला जात असल्याची माहिती दिली होती.
राजकोट येथील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचं वृत्त हे 26 ऑगस्ट 2024 रोजी सकाळच्या सुमारास समोर आलं होतं. त्यानंतर या घटनेचे अनेक पडसाद उमटू लागले.
हे ही वाचा>> Jaydeep Apte ने शिवाजी महाराजांच्या मूर्तीमध्ये का दाखवलेला 'तो' घाव?, ती पोस्ट अन्...
दरम्यान, हा पुतळा कोणी बनवला आणि त्याची निर्मिती कशा पद्धतीने झाली याबाबत शोध घेतला गेला तेव्हा शिल्पकार जयदीप आपटे हे नाव समोर आलं. ब्राँझची मोठी शिल्पं बनविण्याचा फारसा अनुभव नसताना देखील त्याला एवढ्या मोठ्या पुतळ्याचं कंत्राट कसं दिलं गेलं हा सवाल विचारण्यात आला.
दुसरीकडे शिंदे सरकारने या सगळ्या प्रकाराची जबाबदारी झटकत नौदलाकडे बोट दाखविण्याचा प्रयत्न केला. पण असं असताना राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने घटनेच्या दिवशी शिल्पकार जयदीप आपटे याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती.