उस्मानाबादला पावसाने झोडपलं; शेतकरी म्हणतो,’पवारसाहेब फक्त स्टेजवर भिजून उपयोग नाही’

मुंबई तक

– गणेश जाधव, उस्मानाबाद प्रतिनीधी मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्याला पुन्हा एकदा पावसाने झोडपलं आहे. गेल्या १५ दिवसांत उस्मानाबादमध्ये दुसऱ्यांदा ढगफुटीसदृष्य पाऊस झाला आहे. खेड, तेर, ढोकी या परिसरात सलग तीन तास पावसाची संततधार कायम होती, ज्यामुळे सोयाबीनसह तूर, उस अशा पिकांचं नुकसान झालं आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

– गणेश जाधव, उस्मानाबाद प्रतिनीधी

मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्याला पुन्हा एकदा पावसाने झोडपलं आहे. गेल्या १५ दिवसांत उस्मानाबादमध्ये दुसऱ्यांदा ढगफुटीसदृष्य पाऊस झाला आहे. खेड, तेर, ढोकी या परिसरात सलग तीन तास पावसाची संततधार कायम होती, ज्यामुळे सोयाबीनसह तूर, उस अशा पिकांचं नुकसान झालं आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आपली नाराजी व्यक्त केली आहे.

पवार साहेब फक्त स्टेजवर भिजून उपयोग नाही, शेतकरी आता खरा भिजला आहे त्याला मदत करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp