स्वातंत्र्यावर बोलायची Kangana ची औकात नाही, हा देशाचा अपमान – राजू शेट्टी कडाडले
1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वतंत्र नसून ती भीक होती, खरे स्वातंत्र्य हे 2014 साली मिळाले असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे, कंगना रणौनते केलेल्या या वक्तव्यावरुन सध्या देशभरात चांगलाच गदारोळ निर्माण झाला आहे. राजकीय स्तरातूनही या वक्तव्याचा समाचार घेतला जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कंगनाची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. कंगना रणौतची […]
ADVERTISEMENT

1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वतंत्र नसून ती भीक होती, खरे स्वातंत्र्य हे 2014 साली मिळाले असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे, कंगना रणौनते केलेल्या या वक्तव्यावरुन सध्या देशभरात चांगलाच गदारोळ निर्माण झाला आहे. राजकीय स्तरातूनही या वक्तव्याचा समाचार घेतला जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कंगनाची चांगलीच खरडपट्टी काढली आहे.
कंगना रणौतची स्वातंत्र्य यासारख्या मोठ्या विषयावर बोलण्याची औकात आहे का हे आधी तिने तपासून पहावं अशा शब्दांत शेट्टींनी कंगनाचा समाचार घेतला आहे. राजू शेट्टी बुलढाण्यातील चिखली येथे बोलत होते.
Kangana Ranaut: ‘1947 साली स्वातंत्र्य नाही तर भीक मिळाली, खरं स्वातंत्र्य 2014 साली मिळालं’, कंगनाचं वादग्रस्त विधान
पुढे बोलताना शेट्टी म्हणाले की, “भगतसिंग पासून ते नेताजी सुभाष चंद्र बोस पर्यंत स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेकांनी हुतात्मे पत्करले, त्याचबरोबर स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर महात्मा गांधींनी देखील देश एक केला होता, आणि कंगना राणावत सारख्या एखाद्या नटीने अशा पद्धतीचे वक्तव्य करणे म्हणजे हा स्वातंत्र्याचा नाही तर संपूर्ण देशाचा अपमान आहे.”