Lakhimpur Kheri : आशिष मिश्राला दणका! जामीन रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाने सुनावलं
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे आंदोलक शेतकऱ्यांना उडवल्याची घटना घडली होती. या घटनेतील आरोपी असलेल्या आशिष मिश्राला सर्वोच्च न्यायालयात झटका बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आशिष मिश्राचा जामीन रद्द केला आहे. जामीन रद्द करताना न्यायालयाने कडक शब्दात सुनावलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने जामीन रद्द करताना माडलेलं मत अलहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दलचं आहे. अलहाबाद उच्च न्यायालयाने आशिष मिश्राला […]
ADVERTISEMENT

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे आंदोलक शेतकऱ्यांना उडवल्याची घटना घडली होती. या घटनेतील आरोपी असलेल्या आशिष मिश्राला सर्वोच्च न्यायालयात झटका बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आशिष मिश्राचा जामीन रद्द केला आहे. जामीन रद्द करताना न्यायालयाने कडक शब्दात सुनावलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाने जामीन रद्द करताना माडलेलं मत अलहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दलचं आहे. अलहाबाद उच्च न्यायालयाने आशिष मिश्राला जामीन मंजूर केला होता.
सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले?
आशिष मिश्राचा जामीन रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल मत व्यक्त केलं आहे. ‘आशिष मिश्राच्या जामीन अर्जावर न्यायालयाने निष्पक्षपणे आणि सारासार विचार करून या प्रकरणाचा तीन महिन्यात निपटारा करावा.’