Mumbai Rain: रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्टच्या दिवशी समुद्र किनारी जाण्यास बंदी

मुस्तफा शेख

ज्या दिवशी रेड अलर्ट आणि ऑऱेंज अलर्ट असेल तेव्हा सकाळी ६ ते १० या वेळेतच समुद्र किनारी जाणाऱ्यास संमती देण्यात आली आहे. त्यानंतर कुणीही या ठिकाणी किंवा बीचेसवर फिरकू नये असं मुंबई महापालिकेने म्हटलं आहे. मुंबई महापालिकेने यासंदर्भातल्या सूचना जारी केल्या आहेत. यंदाच्या मान्सूनमध्ये समुद्रात बुडून १० लोकांचा जीव गेला आहे. त्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

ज्या दिवशी रेड अलर्ट आणि ऑऱेंज अलर्ट असेल तेव्हा सकाळी ६ ते १० या वेळेतच समुद्र किनारी जाणाऱ्यास संमती देण्यात आली आहे. त्यानंतर कुणीही या ठिकाणी किंवा बीचेसवर फिरकू नये असं मुंबई महापालिकेने म्हटलं आहे. मुंबई महापालिकेने यासंदर्भातल्या सूचना जारी केल्या आहेत. यंदाच्या मान्सूनमध्ये समुद्रात बुडून १० लोकांचा जीव गेला आहे. त्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय मुंबई महापालिका प्रशसनाने घेतला आहे.

Maharashtra Rain : मुंबईसह कोकणाला ऑरेंज अलर्ट, पाच दिवस ‘कोसळधार’

मुंबईत रेड अलर्ट तसंच ऑरेंज अलर्ट ज्या दिवशी देण्यात आला आहे त्यावेळी समुद्र किनाऱ्यांवर गर्दी करू नका, बीचवर पोहायला जाऊ नका असं आवाहन वारंवार आवाहन करण्यात आलं होतं. मात्र ते आवाहन लोक पाळत नाहीत असं दिसून आलं आहे. त्यानंतर रेड अलर्ट किंवा ऑरेंज अलर्ट असताना कुणीही समुद्र किनारी किंवा बीचेसवर फिरायला किंवा पोहायला जाऊ नये असं स्पष्ट करण्यात आलं आहे. मुंबई महापालिकेने यासंदर्भातलं एक पत्रक काढलं आहे.

नेमकं काय म्हटलं आहे मुंबई महापालिकेने?

हे वाचलं का?

    follow whatsapp