अग्निपथ योजनेविषयी रविना टंडनचं ट्विट, जयंत चौधरी म्हणाले, ‘आप मस्त रहो’

मुंबई तक

मोदी सरकारने लष्कर भरती संदर्भात अग्निपथ योजना आणली. या योजनेच्या पहिल्या दिवसापासूनच या योजनेविरोधात विद्यार्थ्यांचा हुंकार पाहण्यास मिळतोय. देशातल्या १३ राज्यांमध्ये आंदोलनांचा भडका उडाला. त्यानंतर या योजनेतली वयाची अट सरकारने वाढवली. या विषयावर अभिनेत्री रविना टंडनने एक ट्विट केलं, त्यानंतर जयंत चौधरी यांनी त्या ट्विटला उत्तर दिलंय. सलमानच्या सर्पदंशावर रविना टंडनची भन्नाट पोस्ट.. म्हणाली ‘साप […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मोदी सरकारने लष्कर भरती संदर्भात अग्निपथ योजना आणली. या योजनेच्या पहिल्या दिवसापासूनच या योजनेविरोधात विद्यार्थ्यांचा हुंकार पाहण्यास मिळतोय. देशातल्या १३ राज्यांमध्ये आंदोलनांचा भडका उडाला. त्यानंतर या योजनेतली वयाची अट सरकारने वाढवली. या विषयावर अभिनेत्री रविना टंडनने एक ट्विट केलं, त्यानंतर जयंत चौधरी यांनी त्या ट्विटला उत्तर दिलंय.

सलमानच्या सर्पदंशावर रविना टंडनची भन्नाट पोस्ट.. म्हणाली ‘साप मेला असेल’

रविना टंडनने एका मीडिया हाऊसचा व्हीडिओ तिच्या ट्विटरवर पोस्ट केला. त्यात काही लोक असे दिसत आहेत ज्यांचं वय २५ पेक्षा जास्त आहे. ते सगळे ठिय्या देत अग्निपथ योजनेचा निषेध करत आहेत. तसंच योजना मागे घ्या अशा घोषणाही देत आहेत. हा व्हीडिओ पोस्ट करत रविनाने लिहिलं की हे पाहा आंदोलन करणारे २३ वर्षांचे विद्यार्थी.

रविना टंडनने हे ट्विट केल्यानंतर राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख जयंत चौधरी यांनी लिहिलंय की रविनाजी आप मस्त रहो… क्यो टेंशन लेती हो. RLD ने अग्निपथ योजनेचा निषेध नोंदवला आहे. तसंच केंद्र सरकारने ही योजना मागे घ्यावी अशीही मागणी केली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp