शिवसेनेचे ३९ आमदार गैरहजर राहिले तर…?; अनंत कळसेंनी सांगितलं पुढे काय होऊ शकतं?
ठाकरे सरकारवरील अस्थैर्याचे ढग गडद झाले असून, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे. मात्र, वेगवेगळे पेच निर्माण झालेले असल्यानं ही प्रक्रिया कशी पार पडेल, असा प्रश्न चर्चिला जात आहे. याचसंदर्भात महाराष्ट्र विधीमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांच्याशी मुंबई Takने संवाद साधला. यावेळी त्यांनी निर्माण झालेल्या राजकीय स्थितीबद्दलच्या […]
ADVERTISEMENT

ठाकरे सरकारवरील अस्थैर्याचे ढग गडद झाले असून, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे. मात्र, वेगवेगळे पेच निर्माण झालेले असल्यानं ही प्रक्रिया कशी पार पडेल, असा प्रश्न चर्चिला जात आहे. याचसंदर्भात महाराष्ट्र विधीमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांच्याशी मुंबई Takने संवाद साधला. यावेळी त्यांनी निर्माण झालेल्या राजकीय स्थितीबद्दलच्या प्रश्नांना उत्तरं दिली.
प्रश्न – सर्वोच्च न्यायालयाने बहुमत चाचणी करण्याला स्थगिती दिली, तर पुढे काय होईल?
अनंत कळसे – प्रत्येकाला न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. त्यामुळे शिवसेना किंवा महाविकास आघाडी सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात. सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालय या प्रकरणावर काय निर्णय देतं त्यानंतरच स्पष्ट होईल. सर्वोच्च न्यायालयाने बहुमत चाचणीला स्थगिती दिली, तर पुढील प्रक्रिया दिलेल्या स्थगिती निर्णयाप्रमाणेच पार पाडली जाईल. सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली, तर अधिवेशन होणार नाही. न्यायालयाने जर सांगितलं की आमच्या समोर हे प्रकरण पूर्ण होईपर्यंत विश्वासदर्शक प्रस्तावाची प्रक्रिया करू नये, असं न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं आणि तसे आदेश दिले, तर ते आदेश सर्वांनाच बंधनकारक आहे.
प्रश्न – सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती दिल्या गेल्याचं याआधी कधी झालं होतं का?









