‘अमित शाह यांना गोध्रा प्रकरणात शरद पवारांमुळे जामीन’; सामनाच्या रोखठोकमध्ये मोठा गौप्यस्फोट
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे गृहमंत्री अमित शहांना गोध्रा प्रकरणात जामीन मिळाल्याचा दावा शिवसेनेचे मुखपत्र सामनाने केला आहे. सामनाच्या रोखठोख या स्तंभात ‘अमितभाई, तुम्ही बोलत रहा! मऱ्हाठा नक्की उठेल! या मथळ्याखाली अमित शहांवर निशाणा साधला आहे. यात अमित शरद पवारांमुळे जामिन मिळाला, असा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. त्यामुळे हे आता चर्चेचा विषय बनत आहे. […]
ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे गृहमंत्री अमित शहांना गोध्रा प्रकरणात जामीन मिळाल्याचा दावा शिवसेनेचे मुखपत्र सामनाने केला आहे. सामनाच्या रोखठोख या स्तंभात ‘अमितभाई, तुम्ही बोलत रहा! मऱ्हाठा नक्की उठेल! या मथळ्याखाली अमित शहांवर निशाणा साधला आहे. यात अमित शरद पवारांमुळे जामिन मिळाला, असा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. त्यामुळे हे आता चर्चेचा विषय बनत आहे.
काय म्हटलंय सामानाच्या रोखठोकमध्ये?
“अमित शहांना महाराष्ट्राविषयी द्वेष आहे. खरे तर त्यांना महाराष्ट्र आणि मराठी माणसांबद्दल नेहमीच कृतज्ञ असायला हवं. जेव्हा यूपीए सरकार मोदी आणि शहांच्या मागे हात धुवून लागले असताना मोदी आणि पवारांच्या सुसंवादामुळेच अमित शहा यांना गोध्रा हत्याकांडातील एका प्रकरणात जामिनावर मुक्त होण्यास मदत मिळाली. हा गौप्यस्फोट नसून सत्य आहे, असं देखील रोखठोकमध्ये लिहलं आहे. आणखी एका प्रकरणात बाळासाहेब ठाकरे यांनी सरकार पद्धतीने भूमिका करून अमित शहा यांना मदत होईल अशी व्यवस्था केली होती. या दोन्ही प्रसंगावर स्वातंत्र्य लिखाण संजय राऊतच करू शकतील. शरद पवार आणि उद्धव ठाकरे बोलू शकतील. पण त्याच ठाकरे आणि पवारांविरोधात टोकाचे मिशन अमित शाह आणि त्यांचे लोक चालवत आहेत, असा दावा सामनामध्ये करण्यात आला आहे.
‘एका बाजूला मिशन मुंबई तर दुसऱ्या बाजूला मिशन बारामती’