Kirit Somaiya: “ठाकरे सरकार जमीनदोस्त झालंय, आता ऑक्टोबरमध्ये अनिल परब यांचे दोन रिसॉर्ट…”

मुंबई तक

राकेश गुडेकर,प्रतिनिधी, रत्नागिरी जुलै महिन्यात उद्धव ठाकरे सरकार जमीनदोस्त झालं. आता ऑक्टोबर महिन्यात अनिल परब यांचे रिसॉर्ट जमीनदोस्त झालेले असेल असा दावा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते. सीआरझेडचे उल्लंघन केल्याप्रकरणात शिवसेना नेते आणि माजी पालकमंत्री अनिल परब यांच्यामुळे चर्चेत आलेल्या दापोली तालुक्यातील मुरुड येथील वादग्रस्त साई रिसॉर्ट पाडण्यासंदर्भात […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राकेश गुडेकर,प्रतिनिधी, रत्नागिरी

जुलै महिन्यात उद्धव ठाकरे सरकार जमीनदोस्त झालं. आता ऑक्टोबर महिन्यात अनिल परब यांचे रिसॉर्ट जमीनदोस्त झालेले असेल असा दावा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते.

सीआरझेडचे उल्लंघन केल्याप्रकरणात शिवसेना नेते आणि माजी पालकमंत्री अनिल परब यांच्यामुळे चर्चेत आलेल्या दापोली तालुक्यातील मुरुड येथील वादग्रस्त साई रिसॉर्ट पाडण्यासंदर्भात आठ दिवसात निविदा प्रक्रिया होईल. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये पाडण्याचा ‘करेक्ट कार्यक्रम’ होईल असं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यावेळी सांगितलं.

किरीट सोमय्यांनी आणखी काय म्हटलंय?

या प्रकरणाशी संबंधित न्यायालयातील दोन याचिकांवर सुनावणी होऊन अनिल परब यांच्यावर फौजदारी कारवाईही सुरु होईल असा विश्वासही सोमय्या यांनी व्यक्त केला. बुधवारी रत्नागिरीत आलेल्या भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. मोहीमकुमार गर्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांच्या भेटी घेतल्या. मुख्यमंत्र्यांनी दापोली मुरुड येथील साई रिसॉर्ट पाडण्याबाबत दिलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीची त्यांनी माहिती घेतली.

हे वाचलं का?

    follow whatsapp