Shiv Sena : भाजप-शिंदेंसोबत युती करणार का? उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
मुंबई : आम्ही भेटत असतो. पण तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनाही गावपातळीवर एकत्रित भेटावं लागेल. जर आपण विधानसभा, लोकसभा निवडणुका एकत्रित लढण्याचा विचार करत आहोत, तर आधी एक शपथ घ्यायला हवी. एकवेळ आपल्या पक्षाच्या पदरात काय पडलं नाही तरी चालेल, पण ग्रामपंचायत असो की सोसायटीची निवडणूक असो. भाजप आणि मिंधे गटासोबत युती करणार नाही, ही पहिली तयारी […]
ADVERTISEMENT

मुंबई : आम्ही भेटत असतो. पण तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनाही गावपातळीवर एकत्रित भेटावं लागेल. जर आपण विधानसभा, लोकसभा निवडणुका एकत्रित लढण्याचा विचार करत आहोत, तर आधी एक शपथ घ्यायला हवी. एकवेळ आपल्या पक्षाच्या पदरात काय पडलं नाही तरी चालेल, पण ग्रामपंचायत असो की सोसायटीची निवडणूक असो. भाजप आणि मिंधे गटासोबत युती करणार नाही, ही पहिली तयारी करा, असं आवाहन शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) एकत्रित बैठकीत केलं. (Uddhav Thackeray clears his stand on alliance with bjp and eknath shinde group)
आगामी ३ महिन्यांच्या काळात महाविकास आघाडीच्या राज्यातील प्रमुख शहरांमध्ये ७ जाहीर सभा पार पडणार आहेत. या सभांचा कार्यक्रम नुकताच घोषित करण्यात आला. या सभांना शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar), काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या सभांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आणि इतर नियोजन करण्यासाठी महाविकास आघाडी नेत्यांची मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरला महत्वाची बैठक पार पडली. याच बैठकीत उद्धव ठाकरे बोलत होते.
मला न्यायदेवतेवर विश्वास :
यावेळी बोलताना ठाकरेंनी न्यायदेवतेवर विश्वास असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, मला देवावर विश्वास आहे, न्यायदेवतेवर विश्वास आहे. मी अनेकदा म्हटलं की लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी तिघांची वाट लागलेली आहे. अशा परिस्थिती आशेचा फक्त एक किरण उरला आहे तो म्हणजे सर्वोच्च न्यायालय. न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असते. तिच्या डोळ्यावरची पट्टी वेगळी आणि धृतराष्ट्राच्या समोर जे वस्त्रहरण झालं होतं ते वेगळं. म्हणून मला खात्री आहे की न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असली तरी आपल्या देशात आता पुन्हा वस्त्रहरण होणार नाही.
Maharashtra Political Crisis : “ठाकरेंनी राजीनामा देऊन राज्यपालांचा निर्णय योग्य ठरवला”