संपत्ती आणि घरगुती वादातून पत्नीने केलं पतीचं अपहरण, नवी मुंबईतला धक्कादायक प्रकार
प्रॉपर्टी आणि घरगुती वादातून पत्नीने पतीचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत घडली आहे. याप्रकरणी पत्नीसह आठजणांना अटक करण्यात आली. यात तीन महिलांचाही समावेश आहे. उरण येथील शेवा पोलिसांनी या आरोपींना कणकवलीमधून 45 वर्षीय विजयराजन चेट्टीयार यांची सुखरूप सुटका केली आहे. नवी मुंबईतील सिवूडस येथील विजयराजन चेट्टीयार यांचे बिल्डर्स आणि डेव्हलपर्स नावाची कंपनी आहे. विजयराजन […]
ADVERTISEMENT

प्रॉपर्टी आणि घरगुती वादातून पत्नीने पतीचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत घडली आहे. याप्रकरणी पत्नीसह आठजणांना अटक करण्यात आली. यात तीन महिलांचाही समावेश आहे. उरण येथील शेवा पोलिसांनी या आरोपींना कणकवलीमधून 45 वर्षीय विजयराजन चेट्टीयार यांची सुखरूप सुटका केली आहे.
नवी मुंबईतील सिवूडस येथील विजयराजन चेट्टीयार यांचे बिल्डर्स आणि डेव्हलपर्स नावाची कंपनी आहे. विजयराजन यांची पत्नी अलगू मिनाक्षी चेट्टीयार यांचे पतीसोबत प्रॉपर्टी संदर्भात सातत्याने वाद होत असल्याने तामिळनाडू येथील न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, विजयराजन हे दुसऱ्या महिलेसोबत राहत असल्याचा संशय आल्याने त्यांच्या पत्नीने तिच्या सहकाऱ्यांसोबत कट रचला. यामध्ये, तिने मालमत्ता खरेदी करण्याचा बहाण्याने दोन महिला बोगस खरेदीदार पाठवून विजयराजन यांना उलवे येथे नेण्यात आले. याचदरम्यान, उलवेनजीक गाडी थांबवून पत्नी आणि तिच्या सहकाऱ्यांनी बोलेरो गाडीतून येऊन विजयराजन यांना धमकावून गाडीत बसविले आणि अपहरण केले.