‘BJP ला आज कळलं असेल ‘या’ माणसाची राक्षसी महत्वाकांक्षा’, जितेंद्र आव्हाड असं का म्हणाले?
शिवसेनेने माध्यमांमध्ये दिलेल्या जाहिरातीवरुन भाजप-शिवसेनेत वाद सुरू झाला आहे. तर याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर जहरी टीका केली आहे.
ADVERTISEMENT

नागपूर: “राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे”, या शिवसेनेकडून (Shiv Sena) देण्यात आलेल्या जाहिरातीवरून भाजप-शिवसेना युतीत जोरदार धुसफूस सुरू झाली आहे. एकीकडे भाजप (BJP) शिवसेनेच्या महत्त्वाच्या मतदारसंघांवर दावा सांगत असतानाच मंगळवारी अचानक एक अशी जाहिरात प्रकाशित झाली की, ज्यामुळे भाजपचं राज्यातील आणि केंद्रीय नेतृत्व देखील नाराज झालं असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. असं असताना याच मुद्द्यावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (CM Eknath Shinde) अत्यंत जहरी शब्दात टीका केली आहे. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. (bjp shiv sena cm eknath shinde devendra fadnavis advertisement dispute ncp jitendra awhad)
‘खांद्यावर पाय ठेवायचा आणि डोक्यावर जायचं.. हा या माणसाचा स्वभाव’
‘आज त्यांना कळलं असेल या माणसाची राक्षसी महत्वाकांक्षी आहेत हे आजच्या जाहिरातीतून स्पष्ट झाले. महाराष्ट्राच्या नकाशावर देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुसण्याचा प्रयत्न झाला. पण ते होणार नाही, म्हणजे खांद्यावर पाय ठेवायचा आणि डोक्यावर जायचं.. माणसाच्या स्वभावाचा आणि चरित्राचा भाग आहे.’ अशी अत्यंत जहरी टीका जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदेंवर केली आहे.
‘मविआ एकत्र लढली तर 200 च्या खाली येणारच नाही…’
‘सामान्य माणसाच्या घरात जा आणि ते काय म्हणतात ते बघा, शरद पवार उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी राहुल गांधी हे सगळे मिळून एकत्र लढले तर 200 जागांच्या खाली येतच नाही. शिंदे साहेबांना बरोबर घेऊन भाजपने स्वतःच्या सर्वात मोठा नुकसान केलं, त्यांचं का नुकसान होणार ते बोलायलाच नको.’
हे ही वाचा >> Mumbai :आर्थर रोड जेल हादरला! दोन कैद्यांकडून एकावर अनैसर्गिक अत्याचार
‘बावनकुळे म्हणाले मविआचे शंभर ते दीडशे जागा येणार, दीडशेच्या आधी 144 जागा येतात आणि ज्यांना 144 जागा मिळतील ते महाराष्ट्रात सरकार बनवतील.’ असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी मविआचं राज्यात सरकार येईल असा दावा यावेळी केला आहे.










