‘…तर नवी पिढी मराठ्यांचा खरा इतिहास कायमचा विसरून जाईल’, जितेंद्र आव्हाड भडकले

मुंबई तक

छत्रपती संभाजीराजे यांनी हर हर महादेव आणि वेडात मराठे वीर दौडले सात सिनेमांचा उल्लेख करत ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड होत असल्याची भूमिका मांडली. त्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली आणि ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाडांच्या नेतृत्वाखाली शो बंद पाडला. यावरून वाद पेटला असून, आता जितेंद्र आव्हाडांनी सविस्तर भूमिका मांडलीये. हर हर महादेव चित्रपट वादावर जितेंद्र आव्हाड यांनी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

छत्रपती संभाजीराजे यांनी हर हर महादेव आणि वेडात मराठे वीर दौडले सात सिनेमांचा उल्लेख करत ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड होत असल्याची भूमिका मांडली. त्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली आणि ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाडांच्या नेतृत्वाखाली शो बंद पाडला. यावरून वाद पेटला असून, आता जितेंद्र आव्हाडांनी सविस्तर भूमिका मांडलीये.

हर हर महादेव चित्रपट वादावर जितेंद्र आव्हाड यांनी लिहिलेली पोस्ट… जशीच्या तशी

मराठ्यांच्या इतिहासाचा विपर्यास कुठल्या हेतूने?

शिवाजी महाराज विरुद्ध बाजीप्रभू देशपांडे हे महाराष्ट्र पचवेल?

त्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक मराठी माणसाची अस्मिता आहेत मग भले तो माणूस कोणत्याही जाती-धर्माचा असो, कारण त्यांचे स्वराज्य हे मराठी लोकांचे हक्काचे राज्य होते जिथे सर्व रयतेला समान प्रेमाने आणि न्यायाने वागवले जात होते. जेव्हा जेव्हा स्वराज्यावर संकट आले तेव्हा तानाजी मालुसरे, जीवा महाला, बाजीप्रभू देशपांडे, मदारी मेहतर, तानाजी मालुसरे अशा सर्व जातीधर्मांच्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी प्राण पणाला लावले, कारण ह्या सगळ्या मावळ्यांची एकच ओळख होती… मराठा! गेल्या 60-70 वर्षात मराठ्यांचा इतिहास विकृत करण्याचे असंख्य प्रयत्न ब. मो. पुरंदरे व त्यांच्या देशी-विदेशी शिष्यांनी हेतुपुरस्सर केले ज्यात महाराजांचा जन्म, त्यांचे पिता, त्यांचे अध्यात्मिक व राजकीय गुरू, त्यांचे पुत्र संभाजीराजे यांचेबाबत जाणीवपूर्वक अफवा उडवून महाराजांना ब्राम्हणशाहीच्या अधीन असणारा एक मुस्लिमद्वेष्टा राजा अशा रुपात दाखवले गेले.

हर हर महादेव वाद : जितेंद्र आव्हाडांचा आक्षेप, अभिजित देशपांडेंनी सांगितले पुस्तकाचं नाव

स्व. यशवंतरावजी चव्हाण आणि नंतरच्या काळात शरद पवार साहेबांच्या काळात इतिहास संशोधनाची साधने, संस्था आणि त्यासाठी लागणारा निधी जेव्हा बहुजन समाजातील अभ्यासक लोकांच्या हाती आले तेव्हा शिवाजीमहाराजांचा आणि एकूणच मराठ्यांचा खरा इतिहास हळूहळू जगासमोर यायला लागला. गोब्राम्हणप्रतिपालक ही महाराजांची मुद्दाम निर्माण केलेली प्रतिमा बदलून ते कुळवाडीभूषण बनले. रामदास हे महाराजांचे गुरु नव्हते हे सिद्ध करताना मा.म. देशमुख यांनी संशोधन क्षेत्रात आणि अगदी कोर्टातही मोठा संघर्ष केला. शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीबाबत अकारण गोंधळ निर्माण केल्याबद्दल ब. मो. पुरंदरे यांच्याकडून पंढरपूरमध्ये अक्षरशः माफीनामा लिहून घेतला गेला. जेम्स लेनला हाताशी धरून आई जिजाऊंची बदनामी करणाऱ्या संस्थांना योग्य धडा शिकवला गेला. आणि तिथे हे स्पष्ट झाले की इथून पुढे शिवाजी महाराजांच्या बाबतीत कुणाला खोटा इतिहास लिहिता येणार नाही!

हे वाचलं का?

    follow whatsapp