एकनाथ शिंदेंचं थेट ‘मातोश्री’ला चॅलेंज! शिवसेनेचा व्हीप ठरवला अवैध, केली मोठी घोषणा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेनेविरोधात बंडखोरी करणारे एकनाथ शिंदे यांनी आता थेट मातोश्रीलाच आव्हान दिल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. पक्षातील असंख्य आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाल्यानं शिवसेनेनं बैठक बोलावली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी शिवसेनेनं व्हीप जारी केला. मात्र, हा व्हीप शिंदे यांनी अवैध ठरवला आहे.

मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर शिवसेनेनं बैठक बोलावली आहे. तसा व्हीप शिवसेनेकडून जारी करण्यात आला आहे. शिवसेनेच्या व्हीपलाच एकनाथ शिंदे यांनी आव्हान दिलं आहे.

बैठकीला उपस्थित राहण्याबाबत शिवसेनेनं आमदारांसाठी व्हीप जारी केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी ट्विट करत मोठी माहिती दिलीये. “शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत,” असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘भाजपला सरकार पाडण्यात यश मिळणार नाही’, राष्ट्रवादी नेत्याचा दावा

एकनाथ शिंदे गटाचा स्फोटक ठराव

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे यांनी मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनी काढलेला व्हीप अवैध असल्याचं म्हटल्यानंतर शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटाने केलेला एक ठराव समोर आला आहे. या ठरावात अनेक गंभीर आरोप केले असून, नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या अटकेचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पाठवलेल्या या पत्रात सरकारमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला आहे. अनिल देशमुख यांनी पोलिसांच्या नियुक्त्यांमध्ये केलेला भ्रष्टाचार, दाऊद इब्राहिम प्रकरणात तुरूंगात असलेले मंत्री नवाब मलिक यांच्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना विरोधकांकडून त्रास सोसावा लागत आहे, असं या पत्रात म्हटलेलं आहे.

एकनाथ शिंदे गटाचा ठराव; ठाकरे सरकारवरती गंभीर आरोप, ‘त्या’ पत्रात नेमकं काय?

जहाल विचारधारेवर आधारित शिवसेनेचा जन्म मराठी माणसांच्या हक्कासाठी झाला आहे. मात्र, मागील अडीच वर्षांपासून आमचा पक्षाला आणि पक्षनेतृत्वाला तत्वांशी तडजोड करावी लागत आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी पारदर्शक आणि प्रामाणिक सरकार लोकांना देण्याचा विचार राहिलेला आहे, पण या सरकार स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून हे होत नाहीये, असंही या पत्रात म्हटलंय.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT