Manoj Jarange: ‘अरेरे तुम्ही काय गप्प बसू नका..’, जरांगेंची धनगर समाजाला हाक
Manoj Jarange Dhangar Reservation: मराठा समाजाप्रमाणेच धनगर समाजाला देखील आरक्षण मिळावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. त्यांनी थेट धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आयोजित मेळाव्यातच हजेरी लावली.
ADVERTISEMENT

Manoj Jarange: अहमदनगर: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मराठा मोर्चाचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) हे आज (24 ऑक्टोबर) थेट धनगर समाजाच्या (Dhangar Reservation) दसरा मेळाव्यात सहभागी झाली. मराठा समाजाप्रमाणेच धनगर समाजाने देखील एकजुटीने सरकारला धारेवर धरणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही देखील अजिबात गप्प बसू नका.. असं म्हणज मनोज जरांगे यांनी धनगर समाजाला देखील चुचकारलं आहे, अहमदनगरमध्ये आयोजित धनगर समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते. (manoj jarange patil leader of the maratha community suggested that dhangar community should unite for reservation)
पाहा मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले:
‘आपल्या दोघांचं (मराठा आणि धनगर समाजाचं) दु:ख एकच आहे. ते सरकार आलं की, पडलेलं म्हणतं की, मी आलो की लगेच आरक्षण देतो. ते पडलेलं निवडून आलं की म्हणतं की चारच दिवसात आरक्षण देतो. अरे तुमची सत्ता येते कधी आणि आम्हाला घुमवता किती.. ही जागरुता आपल्यात येणं गरजेचं आहे.’
हे ही वाचा >> ‘गोपीनाथ मुंडे स्मारक आता बनवू नका’; पंकजा मुंडे भडकल्या, मेळाव्यातून भाजपवर तोफ
‘घराघरातल्या मराठ्यांनी आरक्षणासाठी जशी कंबर कसली. तशी तुम्हाला धनगरांच्या शेवटच्या माणसापर्यंत आरक्षण सांगावं लागेल. जर धनगरांची लाट उसळली तर ती कोणू रोखूच शकत नाही.’
‘आता आमचा शेवटचा दिवस आहे.. संधाकाळपर्यंत आहे आशा.. झाले जागे तर झाले.. पळतात ते विमानं घेऊन सध्या. त्यांनी इतके डाव टाकले पण आपण त्यांचे सगळे डाव उधळले.’