Maratha Morcha: ‘अजितदादा सोबत आल्याने पवार चिडलेत’, जालना लाठीहल्ल्यावर बोलताना फडणवीसांनी डिवचलं
Maratha Morcha: अजित पवार आमच्यासोबत आले आहेत त्यामुळे पवार साहेब नाराज आहेत. चिडलेले आहेत म्हणून ते असे आरोप करत आहेत.’ असं देवेंद्र फडणवीस यांनी जालना लाठीहल्ल्यावरून पवारांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना म्हटलं आहे.
ADVERTISEMENT

Devendra Fadnavis vs Sharad Pawar on Maratha Morcha: मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण आणि आंदोलन करणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी बेछूट लाठीहल्ला चढवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले. ज्याला आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ()maratha morcha sharad pawar is angry because ajit pawar came with us devendra fadnavis taunts pawar while speaking on jalna lathi charge)
‘आत्ताच्या परिस्थितीत पवार साहेबांच्या जवळच्या लोकांनी त्यांना सोडून आमच्यासोबत सरकार तयार केल्यामुळे पवार साहेब फार नाराज आहेत. चिडलेले आहेत, व्यथित आहेत. त्यामुळे ते असे आरोप करत आहेत.’ असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
जालना लाठीहल्ला: देवेंद्र फडणवीसांकडून शरद पवारांना प्रत्युत्तर..
‘माझं आवाहन आहे की, सगळ्यांनी शांतता पाळली पाहिजे. राज्यात याचा कुठेही वेगवेगळ्या घटना घडणं हे योग्य नाही. त्यासोबत माझी राजकीय पक्षांनाही आणि राजकीय नेत्यांनाही विनंती आहे की, मी शब्द वापरतोय त्यासाठी माफ करा.’
‘पण बहती गंगा मे हाथ धोना.. हे बंद करा. हे करणं योग्य नाही हे राज्याच्या हिताचं नाही. कालपर्यंत जे लोकं मराठा आरक्षण मिळू शकत नाही.. मराठ्यांना आरक्षणाची आवश्यकता नाही. असे म्हणणारे ज्येष्ठ नेते आज अचानक त्याठिकाणी लगेच फोनो देतायेत.. मग म्हणतायेत सरकारने जाणीवपूर्ण केलंय का, एका समाजाबद्दल आकस आहे का. माझा त्यांना सवाल आहे की, त्यांनी त्या समाजाबद्दल काय केलं किंवा त्या समाजाच्या आरक्षणाबाबत काय केलं? हे एकदा दाखवावं.’