Parliament Special Session : हा आहे मोदी सरकारचा अजेंडा, मांडणार 4 विधेयके

भागवत हिरेकर

special session of parliament 2023 agenda : मोदी सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात सरकारकडून 4 विधेयके मांडली जाणार आहेत.

ADVERTISEMENT

the government has said that on the first day of the session, the journey of Parliament in 75 years will be discussed in Lok Sabha and Rajya Sabha. During the session, four bills will also be presented in both the houses.
the government has said that on the first day of the session, the journey of Parliament in 75 years will be discussed in Lok Sabha and Rajya Sabha. During the session, four bills will also be presented in both the houses.
social share
google news

Modi Government Agenda for Special Session of Parliament : केंद्र सरकारने 18 ते 22 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनाचा प्रस्तावित अजेंडा जाहीर केला आहे. बुधवारी (13 सप्टेंबर) माहिती देताना सरकारने सांगितले की, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत आणि राज्यसभेत संसदेच्या 75 वर्षांच्या प्रवासावर चर्चा होईल. यावेळी संविधान सभेपासून आजपर्यंतच्या संसदीय प्रवासावर चर्चा होणार आहे. अधिवेशनादरम्यान दोन्ही सभागृहात चार विधेयकेही मांडली जाणार आहेत. (modi government agenda for special session of parliament)

3 ऑगस्ट रोजी राज्यसभेत अधिवक्ता (सुधारणा) विधेयक 2023 आणि प्रेस आणि नियतकालिक नोंदणी विधेयक 2023 मंजूर झाले. हे आता लोकसभेत मांडले जातील. 10 ऑगस्ट रोजी, पोस्ट ऑफिस विधेयक, 2023 आणि मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त (नियुक्ती, सेवा शर्ती आणि पदाचा कार्यकाळ) विधेयक, 2023 राज्यसभेत सादर करण्यात आले, ज्यावर आता विशेष सत्रादरम्यान चर्चा केली जाईल.

हेही वाचा >> ‘किमान गोपीनाथ मुंडेंचे तरी व्हा’, फडणवीसांवर प्रश्नांचा भडीमार

मोदी सरकारने बोलावलेल्या या पाच दिवसीय विशेष अधिवेशनाच्या अजेंड्याबाबत विरोधक सातत्याने प्रश्न उपस्थित करत होते. काँग्रेसकडून सरकारवर निशाणा साधला जात होता. सरकारने अजेंडा जाहीर करावा, अशी मागणी विरोधकांनी केली होती.

आता मोदी सरकारने याबाबतचा प्रस्तावित अजेंडा जारी केला आहे. कारण, विशेष अधिवेशनादरम्यान सरकार ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ आणि देशाचे नाव बदलून ‘भारत’ असा प्रस्ताव आणू शकते, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, सरकारने जाहीर केलेल्या अजेंड्यात त्यांचा उल्लेख नाही.

हे वाचलं का?

    follow whatsapp