राज्यसभा निवडणूक : ‘ट्रायडंट’मधील बैठकीत उद्धव ठाकरे आमदारांना काय म्हणाले?

मुंबई तक

मुंबई: राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election) महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) तीनही पक्षाने आपल्या सर्व आमदारांची मुंबईतील ‘ट्रायडंट’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक घेण्यात आली. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आमदार बैठकीला हजर होते. याच बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया देताना भाजपला जोरदार टोलाही लगावला आहे. तसंच आपल्या सर्व आमदारांना एकजुटीने राहण्याचा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election) महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) तीनही पक्षाने आपल्या सर्व आमदारांची मुंबईतील ‘ट्रायडंट’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक घेण्यात आली. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आमदार बैठकीला हजर होते. याच बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया देताना भाजपला जोरदार टोलाही लगावला आहे. तसंच आपल्या सर्व आमदारांना एकजुटीने राहण्याचा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले:

‘कोणी कितीही प्रयत्न केला तरी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार नक्कीच निवडून येणार. खरंतर विचित्र गोष्ट आहे. आतापर्यंत एक परंपरा राहिलेली आहे बिनविरोध निवडणुकीची. सभ्यता आणि राजकारण तशा परस्परविरोधी गोष्टी आहेत पण राजकारणात थोडी सभ्यता असायला हरकत नाही. आता जवळजवळ चोवीस-पंचवीस वर्षांनी राज्यसभेची निवडणूक होत आहे. पण परंपरा पाळायला काहीच हरकत नव्हती.’ असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला आहे.

दरम्यान, यावेळी पत्रकारांनी आमदारांना काय सांगितलं? असा प्रश्न विचारला त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की. ‘असं सांगण्यासारखं असतं तर तुम्हाला आतमध्ये बोलावलं असतं. पण कोणी कितीही प्रयत्न करु दे मात्र महाविकास आघाडीचे चारी उमेदवार निवडून येतील असा मला विश्वास आहे.’

बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे आमदारांना काय म्हणाले?

हे वाचलं का?

    follow whatsapp