14 श्री सदस्य मृत्यू: ‘तो अधिकारी स्वच्छ आणि प्रामाणिक, पण बॉससमोर…’ पवार असं का म्हणाले?
14 श्री सदस्यांच्या मृत्यूप्रकरणी जी शिंदे सरकारने एकसदस्यीय समिती नेमली त्याबाबत शरद पवार यांनी गंभीर सवाल उपस्थित करत सरकारवर टीका केली आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: नवी मुंबईतील खारघर येथे 16 एप्रिल रोजी जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) सोहळा पार पडला त्यात तब्बल 14 श्री सदस्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या प्रकरणी विरोधकांनी सरकारविरोधात बरेच आरोप करणं सुरू केलं आहे. ज्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक सदस्यीय समिती नेमली आहे. पण त्याचविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी शेलक्या शब्दात टीका केली आहे. (sharad pawar criticized shinde government on one member committee in the death of 14 shree sevak)
‘श्री सदस्यांच्या चौकशीसाठी जो अधिकारी नेमला आहे तो अधिकारी स्वच्छ आणि प्रामाणिक आहे. शेवटी तो सरकारी अधिकारी आहे. सरकारी अधिकारी आपल्या बॉससमोर… तो कितीही प्रामाणिक असला, तरी सत्यस्थिती पुढे येऊ शकणार नाही.’ असं म्हणत शरद पवार यांनी शिंदेंनी नेमलेल्या एकसदस्यीय समितीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
श्री सदस्यांच्या मृत्यू प्रकरणी काय म्हणाले शरद पवार?
मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या शिबिरात शरद पवार बोलत होते. “मी जितेंद्र आव्हाडांचं भाषण ऐकत होतो. काय घडलं खारघरला? खारघरला घडलं, त्यात एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, ज्याचा जयंतरावांनी उल्लेख केला. महाराष्ट्र भूषण हा कार्यक्रम राज्य सरकारचा कार्यक्रम आहे. राज्य सरकारचा कार्यक्रम असतो, त्यावेळी त्या कार्यक्रमाच्या आयोजनाची निमंत्रितांची ही जबाबदारी शंभर टक्के राज्य सरकारवर असते”, असं म्हणत शरद पवारांनी खारघरमध्ये घडलेल्या दुर्घटनेला शिंदे-फडणवीस सरकारला जबाबदार धरलं.
हे ही वाचा>> सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंचीच केली कोंडी; पत्रात देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख
शरद पवारांनी पद्म पुरस्काराची आठवण यावेळी सांगितली. ते म्हणाले, “मला आठवतं की एकदा मला केंद्र सरकारने पद्म विभूषण दिलं. पद्म विभूषण घेण्यासाठी जावं कुठं लागलं, तर राष्ट्रपती भवनला. आयोजित कुणी केलं केंद्र सरकारने. हजर लोक किती होते, माझ्या कुटुंबीयांच्या वतीने मित्रांच्या वतीने एकूण 10 लोक. यापेक्षा कुणाला परवानगी नाही. त्याचं महत्त्वाचं कारण हा कार्यक्रम सरकारी होता. केंद्र सरकारचा होता. महाराष्ट्र भूषण हा कार्यक्रम सुद्धा धर्माधिकारींच्या सन्मानार्थ होता. हा कार्यक्रम धर्माधिकाऱ्यांच्या संघटनेनं आयोजित केलेला नव्हता, तो महाराष्ट्र सरकारने आयोजित केलेला होता”, असं शरद पवार म्हणाले.