NCP : अजित पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान? जाहिरात वादात!

भागवत हिरेकर

NCP Supreme court Ajit Pawar : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर अजित पवार गटाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे, मात्र यावर शरद पवार गटाने आक्षेप घेतला आहे.

ADVERTISEMENT

उपमुख्यमंत्री अजित पवार.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अजित पवार गटाची जाहिरात वादात

point

सर्वोच्च न्यायालयाने काय दिले आहेत निर्देश?

point

जितेंद्र आव्हाड यांची अजित पवार गटावर टीका

Ajit Pawar NCP Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेकडून जाहिरात प्रसिद्ध कऱण्यात आली आहे. मात्र, या जाहिरातीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. जितेंद्र आव्हाडांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देताना अजित पवार गटाकडून न्यायालयाचा अवमान झाल्याचे म्हटले आहे. नेमकं काय झालं ते जाणून घ्या... (Controversy has arisen due to the advertisement released by Ajit Pawar's NCP.)

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाला शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार गटाला आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तुतारी हे निवडणूक चिन्ह वापरण्यास परवानगी दिली, तर घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला देताना काही निर्देश दिले आहेत. 

अजित पवार गटाची जाहिरात

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने जाहिरात वर्तमानपत्रात दिली आहे. त्यात म्हटलं आहे की, भारत निवडणूक आयोगाने अजित अनंतराव पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घड्याळ चिन्ह दिले आहे. हे प्रकरण सध्या माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर आहे आणि अंतिम निकालाच्या अधीन राहून, माननीय सर्वोच्च न्यायालयाने मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी सर्व निवडणुकांसाठी घड्याळ निवडणूक चिन्ह वापरण्याची परवानगी दिली आहे."

हेही वाचा >> "मंत्री म्हणतोय, पंतप्रधान मोदींना देशाची घटना बदलायचीय" 

जितेंद्र आव्हाडांचे म्हणणे काय?

आव्हाड यांनी अजित पवार गटाची जाहिरात पोस्ट केली आहे. ते म्हणतात, "अजित पवार गटाने दिलेली ही जाहिरात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नाही. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय देताना अतिशय स्पष्टपणे आदेश दिलेले आहेत. हा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आज्ञाभंग असून, न्यायालयाचा अवमान आहे", असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp