Bacchu Kadu : बच्चू कडू एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांना धक्का देणार?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

why bacchu kadu and sharad pawar meeting important in maharashtra politics?
why bacchu kadu and sharad pawar meeting important in maharashtra politics?
social share
google news

Bacchu Kadu Sharad Pawar : राजकारणात नेत्यांच्या भेटीगाठी सहजच दाखवल्या जात असल्या, तरी त्या तशा नसतात. 2019 नंतर महाराष्ट्रात झालेले राजकीय भूकंप आणि बदललेलं राजकारण याची साक्ष देतंय. आता हे सांगण्याचं कारण म्हणजे बच्चू कडू आणि शरद पवारांची भेट. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या शब्दावर एकनाथ शिंदेंसोबत गेलेले आमदार कडू महायुतीला धक्का देण्याच्या विचारात असल्याची चर्चा जोरात सुरू झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलून जातील.

उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या बच्चू कडूंचा शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये हिरमोड झाला. शिंदेंच्या सरकारमध्ये मंत्री होण्याची बच्चू कडूंना आशा होती, मात्र ती मावळली आहे. त्यामुळेच गेल्या काही महिन्यांपासून बच्चू कडू थेट सरकार आणि भाजपवर हल्ला करताना दिसत आहेत. अशातच अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांना चहासाठी निमंत्रण दिल्याने बच्चू कडूंच्या मनात चाललंय काय? हा प्रश्न सध्या राजकारणात रस असलेल्यांना पडलाय.

बच्चू कडू महाविकास आघाडीत येणार?

आमदार कडू यांनी शरद पवारांना चहाला बोलवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. याचा अर्थ ते शिंदे फडणवीसांची साथ सोडण्याच्या मनस्थितीत आहे, असाही लावला जात आहे. कडू महाविकास आघाडीत येणार आहेत का? या प्रश्नाला पवारांनी वेगळंच उत्तर दिलं. ते म्हणाले, “कशावरून, तुमच्याकडे तशी माहितीये का? मी त्यांच्याकडे जातोय यामागे काही राजकीय हेतू नाही. एका विधानसभेच्या सदस्याने चहाला या म्हणून सांगितलं तिथे एवढी चर्चा करण्याचं कारण नाही.” शरद पवारांनी असं उत्तर देत चर्चेला तात्पुरता विराम दिला. पण, बच्चू कडूंच्या भूमिकेबद्दलची चर्चा कायम आहे. या मागे काही कारणंही आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> अजित पवारांचे पदाधिकारी ऐटीत फिरणार, 40 बोलेरो आणि 40 स्कॉर्पिओ दिल्या गिफ्ट

मंत्रिपद न मिळाल्याने नाराजी

उद्धव ठाकरेंनी आपल्या सरकारमध्ये बच्चू कडूंना मंत्रिमंडळात घेतलं होतं. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर बच्चू कडू मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार होते. मंत्री होण्याबद्दल त्यांनी त्या काळात लक्ष वेधून घेणारी विधानंही केली होती. पण, अपंग कल्याण विभाग निर्माण करून आणि त्याचे अध्यक्षपद देऊन शिंदे-फडणवीसांनी त्यांची बोळवण केली. त्यामुळे बच्चू कडू नाराज दिसले.

हेही वाचा >> खैरे-दानवेंनी वाढवला ठाकरेंचा ताण, मातोश्रीवरील बैठकीत काय झालं?

शिंदेंच्या शिवसेनेच्या भवितव्याबद्दल वेगवेगळे मुद्दे उपस्थित होताहेत. महत्त्वाचं म्हणजे सातत्याने काही गोष्टी चर्चेत येतात, त्यातील एक म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेतील अनेक आमदार-खासदार भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. ही गोष्ट अनेकदा शिवसेनेकडून फेटाळून लावण्यात आली आहे. पण, राजकीय वर्तुळातील नेत्यांकडूनच याबद्दलच्या शक्यता व्यक्त केल्या जात आहे, त्यामुळे अनिश्चितता नेत्यांमध्ये दिसत आहे. हे बच्चू कडू यांच्या बोलण्यातूनही जाणवत आहे.

ADVERTISEMENT

बच्चू कडू शरद पवारांच्या भेटीपूर्वी काय म्हणाले, ते वाचा

“शरद पवारांना फोन केला होता की, इथून चालले आहात तर घरी या. एकनाथ शिंदे जोपर्यंत मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत असा कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही. शिंदेसाहेब नसतील, तर मग कदाचित घेऊ. आमचा पक्ष आहे. आमच्या पक्षाचं कुठे भलं होतं, जसं प्रत्येकजण आपलं चांगभलं पाहतात, तसं आम्हीही पाहणार आहोत. राजकारणात जिथे राजकीय अस्तित्व मजबूत होईल, तो आमचा सोबती राहील”, असे बच्चू कडू म्हणाले. बच्चू कडूंच्या भूमिकेतून त्यांच्या मनातील राजकीय चलबिचल दिसून येते.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> “काकांच्या सावलीत वाढलेले अजित पवार…”, आव्हाडांनी इतिहासच काढला

शरद पवारांनी नकार दिला, पण…

बच्चू कडूंनी चहा घेण्यासाठी बोलावलं आहे, असं सांगत शरद पवारांनी राजकीय शक्यतांना पूर्णविराम दिला. पण, 2019 पासून शरद पवारांच्या मोदींपासून इतर नेत्यांसोबत झालेल्या भेटी आणि त्यानंतर काही काळानंतर त्याबद्दल समोर आलेली माहिती, बघता कडू आणि पवारांमधील ही भेट चहापानासाठी नाही, असेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यामुळे काय घडणार याबद्दल उत्सुकता वाढली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT