BJP: हर्षवर्धन पाटलांचं गृहमंत्री फडणवीसांना पत्र, महायुतीत मोठी खळबळ
BJP नेते हर्षवर्धन पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहून मित्र पक्षांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. ज्यामुळे महायुतीत मात्र खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

हर्षवर्धन पाटलांचं जाहीर पत्र

देवेंद्र फडणवीसांकडे कोणाची केली तक्रार

जीवाला धोका असल्याचा हर्षवर्धन पाटलांचा दावा
Harshvardhan Patil: बारामती: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये दिवसेंदिवस धुसफूस ही वाढतच आहे. महाराष्ट्रात तीन पक्ष सत्तेत एकत्र असल्याने जागा वाटपाचा तिढा कायम आहेत. अशातच आता महायुतीतील नेतेच एकमेकांविरोधात गंभीर आरोप करत आहेत. भाजपचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट खुलं पत्र लिहून मित्र पक्षातील नेत्यांबाबत अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. (bjp leader harshvardhan patil has written a letter to home minister devendra fadnavis and made very serious allegations complaint tone about ajit pawar ncp)
इंदापूरमधील मित्र पक्षाचे पदाधिकारी जाहीर सभांमधून एकेरी आणि शिवराळ शब्दात टीका करत असल्याचं हर्षवर्धन पाटलांनी म्हटलं आहे. तसेचं तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी देखील दिली जात असल्याचा आरोप पाटलांनी पत्राच्या माध्यमातून केला आहे.
हे ही वाचा>> 'तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन...', कदम भाजपवर संतापले
सगळ्यात आधी आपण हर्षवर्धन पाटलांनी फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात नेमकं काय आरोप केले ते आपण पाहूयात..
हर्षवर्धन पाटलांचं 'ते' पत्र जसंच्या तसं
मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब
उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री
महाराष्ट्र राज्य