BJP: हर्षवर्धन पाटलांचं गृहमंत्री फडणवीसांना पत्र, महायुतीत मोठी खळबळ

मुंबई तक

ADVERTISEMENT

हर्षवर्धन पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र
हर्षवर्धन पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र
social share
google news

Harshvardhan Patil: बारामती: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये दिवसेंदिवस धुसफूस ही वाढतच आहे. महाराष्ट्रात तीन पक्ष सत्तेत एकत्र असल्याने जागा वाटपाचा तिढा कायम आहेत. अशातच आता महायुतीतील नेतेच एकमेकांविरोधात गंभीर आरोप करत आहेत. भाजपचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट खुलं पत्र लिहून मित्र पक्षातील नेत्यांबाबत अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. (bjp leader harshvardhan patil has written a letter to home minister devendra fadnavis and made very serious allegations complaint tone about ajit pawar ncp)

इंदापूरमधील मित्र पक्षाचे पदाधिकारी जाहीर सभांमधून एकेरी आणि शिवराळ शब्दात टीका करत असल्याचं हर्षवर्धन पाटलांनी म्हटलं आहे. तसेचं तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी देखील दिली जात असल्याचा आरोप पाटलांनी पत्राच्या माध्यमातून केला आहे.

हे ही वाचा>> 'तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन...', कदम भाजपवर संतापले

सगळ्यात आधी आपण हर्षवर्धन पाटलांनी फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात नेमकं काय आरोप केले ते आपण पाहूयात..

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हर्षवर्धन पाटलांचं 'ते' पत्र जसंच्या तसं

मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब 
उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री
 महाराष्ट्र राज्य

महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचे सरकार आपल्या मार्गदर्शनाखाली योग्य पध्दतीने कामकाज करीत आहे. परंतु माझ्या तालुक्यामध्ये मी आपल्या नेतृत्वाखाली राजकिय व सामाजिक जिवनात काम करत असताना इंदापूर मधील मित्र पक्षांचे काही पदाधिकारी राजकीय जाहीर मेळावे व सभांमधून माझेवरती अतिशय खालच्या पातळीवर, एकेरी व शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करीत आहेत. त्याचबरोबर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे मला माझ्या सुरक्षिततेची चिंता वाटत आहे.

ADVERTISEMENT

सदरील बाब अतिशय गंभीर असून, आपण यामध्ये तात्काळ लक्ष घालावे. अशा गुंड प्रवृत्तींच्या लोकांना वेळीच आळा घालणे आवश्यक आहे. तरी आपण या बाबत ठोस भूमिका घेउन योग्य त्या कारवाईचे आदेश देऊन सहकार्य करावे, हि विनंती.

ADVERTISEMENT

असे गंभीर आरोप हर्षवर्धन पाटलांनी केले आहेत. दरम्यान, त्यांच्या या पत्रामुळे आता मात्र, उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे बोट?

भाजपने 2 मार्च रोजी लोकसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर केली. ज्यामध्ये तब्बल 195 जागांवरचे उमेदवार हे जाहीर केले. पण यामध्ये महाराष्ट्रातील एकाही जागेवरील उमेदवार भाजपने जाहीर केला नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात अशीही चर्चा सुरू आहे की, राज्यात शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप यांच्यात जागा वाटपावरून प्रचंड धुसफूस सुरू आहे.

हे ही वाचा>> शिंदे गटाच्या आमदाराच्या कारने युवकाला उडवले, जागीच ठार

कारण तीन पक्ष एकत्र आल्याने नेमका फॉर्म्युला कसा असावा आणि कोणत्या पक्षाला कोणत्या जागा मिळायला हव्या यावरून सध्या बराच तणाव आहे. तसंच अनेक वर्ष जे पक्ष किंवा उमेदवार एकमेकांविरोधात लढले त्यांना यंदा एकत्र येऊन काम करावं लागणार आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर देखील बरीच नाराजी आहे. 

इंदापूरमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे. आतापर्यंत गेली अनेक वर्ष भाजपने राष्ट्रवादीला टक्कर दिली आहे. पण आता स्वत: अजित पवार हे भाजपसोबत आल्याने येथील सर्व गणितं बदलली आहेत. कारण बारामतीमधून सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळजवळ पक्की झाली आहे. त्यामुळे भाजपमध्ये मात्र प्रचंड नाराजी असल्याचं समजतं. अशातच इंदापूर तालुक्यातील भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांना टार्गेट करण्यात येत आहे. 

त्यामुळेच हर्षवर्धन पाटील यांनी जे पत्र गृहमंत्र्यांना दिलं आहे त्यावरुन त्यांचा रोख हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्याकडे असल्याचं बोललं जात आहे. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT