Mumbai Tak Chavadi: ‘उद्धवजींचे खेळ आणि चाळे, मीच शहाणा..’ आशिष शेलारांची जहरी टीका

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

bjp mla ashish shelar venomous criticism on uddhav thackeray mumbai tak chavadi said alliance was broken due to uddhav thackerays games and tricks political news maharashtra
bjp mla ashish shelar venomous criticism on uddhav thackeray mumbai tak chavadi said alliance was broken due to uddhav thackerays games and tricks political news maharashtra
social share
google news

Ashish Shelar BJP: मुंबई: ‘उद्धवजींचे खेळ आणि चाळे, हेतू आणि उद्देश हे बघितल्यावर लहान बालकही उद्धवजींच्या मनात काय चाललंय हे स्पष्ट कळत होतं.’अशा जहरी शब्दात मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुंबई Tak चावडीवर (Mumbai Tak Chavadi) उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका केली. (bjp mla ashish shelar venomous criticism on uddhav thackeray mumbai tak chavadi said alliance was broken due to uddhav thackerays games and tricks political news maharashtra)

मुंबई Tak च्या चावडीवर गप्पा मारताना आशिष शेलारांनी अनेक प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरं दिली. मात्र, याचवेळी 2014 साली जी युती तुटली त्याबाबत बोलताना शेलारांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. पाहा चावडीवर आशिष शेलार नेमकं काय-काय म्हणाले.

‘उद्धवजींचे खेळ आणि चाळे..’

‘उद्धवजींचे खेळ आणि चाळे, हेतू आणि उद्देश हे बघितल्यावर लहान बालकही उद्धवजींच्या मनात काय चाललंय हे स्पष्ट कळत होतं. मला वाटतं त्याही वेळेला उद्धवजी अहंकारापोटी, तिरस्कारापोटी आणि मीच शहाणा या भूमिकेपोटी भाजपला हिडीसफिडीस करत होते. आज झालेल्या उद्धवजींच्या पक्षाची अवस्था ही त्यांच्या अंहकारी वागण्यातूनच झालेली आहे.’ अशी जहरी टीका शेलारांनी यावेळी केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘मला वाटतं की, एकनाथ खडसे जे आज बोलत आहेत ते अर्ध खोटं नाही संपूर्ण खोटं बोलतायेत.. याचं कारण खडसेंनी थोडं मागे गेलं तर लक्षात येईल. ज्याचा अर्धा उल्लेख त्यांच्या.. मी पाहिली त्यांची ती मुलाखत.. त्यामध्ये ते म्हणाले की, मी स्वत: मुक्ताईनगरला होतो असं ते म्हणाले.. खरं तर त्यावेळेला तिथे होतो. मी मुंबईचा अध्यक्ष होतो.. विनोद तावडे, फडणवीस.. निरीक्षक ओम माथूर होते. या अगोदरच्या घटनाक्रमाकडेही पाहायला लागेल. सोयीस्कररित्या एकनाथ खडसे ते विसरलेले दिसतायेत.’

‘आमचे 151 प्लस ही घोषणा युवराज आदित्य ठाकरे यांनी परस्पर केली होती. तशी बॅनरबॅजी केली होती, तोवर कोणतीही युतीच्या जागावाटपाची चर्चा झाली नव्हती. याचा अर्थ मी तुम्हाला मोजतच नाही.. 151 माझे शिवसेनेचे.. या अंहकारामध्ये आदित्य-उद्धवजी होते. त्यानंतरचा घटनाक्रम पाहिला तर लक्षात येईल.. जे खडसे साहेब विसरले.’

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> No-Confidence Motion: ‘…तर मी तुमची औकात काढेल’, राणेंनी लोकसभेत का वापरले असे शब्द?

‘गोपीनाथ मुंडे साहेब हयात असताना त्यांनी अन्य घटक पक्षाला महायुतीत जोडलं होतं. इतर पक्षांना जोडण्याचे काम करत होते. त्याचवेळेला उद्धवजी प्रस्तावित असलेल्या आमच्या मित्र पक्षांना सुद्धा फूट पाडून त्यांच्यातील काही सहकाऱ्यांशी तुला मी जास्त जागा देतो.. तू माझ्याबरोबर ये हा त्याठिकाणी खेळ करत होते.’

ADVERTISEMENT

‘युतीत असताना 151 प्लस, युतीत असतानाही सहकारी पक्षांच्या नेते फोडून किंवा बाजूला घेऊन त्यांच्याशी चर्चा करायची.. त्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात ज्यावेळेला अन्य पक्षातून काँग्रेस, राष्ट्रवादीतून लोकं येत होती.. त्यांना थांबा आम्ही वेगळे लढू आमच्याकडे या.. हे केलेले चाळे.. हे उद्धवजींच्या पक्षाचे चाळे होते.’ अशा शब्दात शेलारांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर टीका केली.

‘युती भाजपने नाही तोडली तर..’

‘त्यादिवशीचं प्रकरण.. म्हणजे एकनाथ खडसेंच्या पत्रकार परिषदेच्या आधी ओम माथूर यांच्या घरी एका मजल्यावर दिवाकर रावते, अनिल देसाई बसले होते. आणखी काही जागा मिळतील का? यासाठी आले होते. दुसऱ्या मजल्यावर देवेंद्रजी, ओम माथूर, विनोद तावडेजी मी.. असे आम्ही बसलो होतो.’

‘बाहेरून या गोष्टी कानावर येत होत्या.. जी जागा मागितली जात होती तिकडचा आमचा माणूस त्याच्याशी परस्पर बोललं जातंय. या सगळ्यात जागांचं वाटप होत नव्हतं. हेतू आणि उद्देश उद्धवजींच्या शिवसेनेचा अप्रमाणिक दिसत होता. त्या चर्चा अपूर्ण होत होत्या. वाट बघायला लागत होती. म्हणून ताडताडपणे दिवाकर रावते, अनिल देसाई किती वेळ लागतोय.. असं म्हणत खाली उतरून त्यांनी मीडियाला पहिली प्रतिक्रिया दिली की, कसली युती, काय आहे..’

हे ही वाचा >> ‘…त्यावेळी गिरीश महाजन हाफ पँटवर फिरायचे’; एकनाथ खडसे का भडकले?

‘नंतर ठरलेला निर्णय त्यावर खडसे बोलले.. खडसे जे आता बोललो ते पूर्ण सत्य नव्हे.’

‘राजीव प्रताप रुडींनी त्यावेळी कोणतीही पत्रकार परिषद घेतली नव्हती. उद्धवजींचे खेळ आणि चाळे, हेतू आणि उद्देश हे बघितल्यावर लहान बालकही उद्धवजींच्या मनात काय चाललंय हे स्पष्ट कळत होतं. मला वाटतं त्याही वेळेला उद्धवजी अहंकारापोटी, तिरस्कारापोटी आणि मीच शहाणा या भूमिकेपोटी भाजपला हिडीसफिडीस करत होते. आज झालेल्या उद्धवजींच्या पक्षाची अवस्था ही त्यांच्या अंहकारी वागण्यातूनच झालेली आहे.’ असं म्हणत आशिष शेलारांनी युती ही शिवसेनेमुळे तुटली असा आरोप केला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT