'सत्तातुरांना ना भय ना लज्जा!', 'सामना'तून सरकारचे वाभाडे

मुंबई तक

ADVERTISEMENT

himachal bjp politics
himachal bjp politics
social share
google news

Himachal Pradesh : चंदीगडच्या महापौर पदाच्या निवडणुकीनंतर भाजपवर (BJP) आज सामनातून हिमाचल प्रदेशातील राजकीय घडामोडींवरून पुन्हा जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यसभा निवडणुकांच्या निमित्ताने मोदी, शहा, नड्डा हे हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) काँग्रेस सरकार (Congress Government) पाडायला निघाले होते, पण या पाडापाडीत भाजपची अवस्था ‘टांगा पलटी घोडे फरार’ अशी झाल्याचे सांगत आजच्या सामनातून भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

सामनाच्या आजच्या अग्रलेखातून टीका करताना हिमाचलमध्ये नेमकं काय घडले. त्यामध्ये भाजपने घटनाबाह्य केलेल्य अनेक गोष्टींवर त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे. 

भाजप सरकारचे बाभाडे

यावेळी टीका करताना सामनातून म्हटले आहे की, 'हिमाचलचे सरकार पाडण्याच्या खेळात भाजपच्या 14 आमदारांना विधानसभा अध्यक्ष पठानिया यांनी निलंबित केले, मात्र त्याचबरोबर पक्षादेश झुगारून ज्या सहा काँग्रेस आमदारांनी भाजप उमेदवाराला मतदान केले होते त्यांनाही अपात्र ठरविल्याचे सांगत भाजप सरकारचे सामनातून बाभाडे काढले आहेत. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> पवारांचं निमंत्रण शिंदे-फडणवीसांनी नाकारलं, पण अजितदादा

भाजपची कूटनीती सांगत राजकारणात कशा प्रकारे भाजपकडून घोडेबाजार कशा पद्धतीने केला जात आहे. त्यावरूनही त्यांनी सामनाच्या अग्रलेखातून जोरदार निशाणा साधला आहे. 

यावेळी हिमाचल विधानसभेतील वास्तवही त्यांनी सांगितले आहे. हिमचाल विधानसभेत काँग्रेसचे 40 आमदार आहेत, त्या आमदारांना 3 अपक्ष आमदारांचा पाठिंबाही आहे. त्यामुळे राज्यसभेच्या एका जागेसाठी मतांचा कोटा 34 होता. 

ADVERTISEMENT

‘काँग्रेजी’ हर्ष महाजन

काँग्रेसकडे मतांचा कोटा असल्यामुळे काँग्रेसचा उमेदवार सहज निवडून येणे अपेक्षित होते. मात्र फक्त 25 आमदार असलेल्या भाजपने माजी ‘काँग्रेजी’ हर्ष महाजन यांना उमेदवार घोषित केले व काँग्रेसच्या कोटय़ातील नऊ मते फोडून महाजन यांना विजयी केले. 

ADVERTISEMENT

हा सरळ घोडेबाजार झालाच, पण काँग्रेस आमदारांनी क्रॉस व्होटिंग करून पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन केल्याचे म्हणत काँग्रेसच्या मतांवर दरोडा टाकून जिंकल्याचा ठपका सामनातून करण्यात आला आहे. 


हर्ष महाजन यांच्या विजयावरूनही सामनातून भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. मोदी-शहांच्या विचारांचा विजय असल्याचे सांगून भाजपने आनंदोत्सव साजरा केला, मात्र हा लोकशाहीतला निर्लज्जपणा असल्याचा घणाघातही त्यांनी केला  आहे.

काँग्रेसच्या सरकारला जीवदान

हिमाचलमधील राज्यसभेची एक जागा भाजपने जिंकली असली तरी त्यावरूनच सामनातून अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हा विजय भाजपला आता महाग पडणार असल्याचे सांगत पक्षादेश झुगारून मतदान करणाऱ्या काँग्रेसच्या सहा आमदारांना अपात्रही करण्यात आले. 

मात्र त्याचवेळी भाजपच्या 15 आमदारांना निलंबितही करण्यात आले. त्यामुळे आता काँग्रेसच्या सरकारला जीवदान मिळाले आहे तर हर्ष महाजन यांच्या विजयावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचेही सांगण्यात आले आहे. 

सामनाच्या आग्रेलखातून काँग्रेसचीही कानउघडणी केली आहे. काँग्रेसचे आमदार फुटल्यानंतर तिथे डी. के. शिवकुमार यांची काँग्रेसने निवड करून काँग्रेसवर ओढावलेले संकट दूर केले असले तरी रात्र वैऱ्याची असून यापुढंही त्यांनी दक्ष राहावे असा सल्ला काँग्रेसलाही देण्यात आला आहे.

हे ही वाचा >> Crime : डबल मर्डरने पालघर हादरलं!

    follow whatsapp

    ADVERTISEMENT