शेतकरी कर्जमाफी: बच्चू कडूंची CM फडणवीसांसोबत बैठक सुरू असतानाच आला GR, नेमकं काय आहे जीआरमध्ये?
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी फडणवीस सरकारने उच्चाधिकार समिती स्थापन केली आहे. एकीकडे बच्चू कडू यांची सरकारसोबत बैठक सुरू असतानाच जीआर जारी करण्यात आला.
ADVERTISEMENT

नागपूर: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात एक महत्त्वपूर्ण वळण आले आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्यासह अनेक शेतकरी नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आज (30 ऑक्टोबर) मुंबईत बैठक पार. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर अभ्यास करण्यासाठी उच्चाधिकार समिती स्थापन करण्याचे आदेश दिले. एकीकडे ही बैठकी सुरू असतानाच या समितीचा सरकारी स्थापन करण्याचा जीआर तातडीने जारी करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे शेतकरी आंदोलनात तात्पुरती शांतता आली असली तरी, शेतकरी नेत्यांनी पूर्ण कर्जमाफीची मागणी कायम ठेवली आहे.
सरकारकडून जीआर जारी
मुख्यमंत्री यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली 9 जणांची उच्चाधिकार समिती गठीत करण्यात आली आहे. ज्यांना पुढील 6 महिन्यात त्यांचा अहवाल सादर करायचा आहे.
संपूर्ण जीआर पाहण्यासाठी क्लिक करा View PDF
आंदोलनाची पार्श्वभूमी
महाराष्ट्रातील शेतकरी गेल्या काही दिवसांपासून कर्जमाफीच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील 'महा एल्गार मोर्चा'ने नागपूरजवळील राष्ट्रीय महामार्ग 44 (नागपूर-वर्धा रोड) रोखून धरला होता. हजारो शेतकरी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते, ज्यामुळे 20 किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.










