Maratha Reservation: हायकोर्टाचे आदेश आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं 'ते' विधान, आता नेमकं घडणार तरी काय?

मुंबई तक

CM Devendra Fadnavis: मराठा आंदोलनाविषयी कोर्टाने काही निर्देश दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील एक मोठं विधान केलं आहे. जाणून घ्या मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: मुंबईतील मराठा आंदोलनावरून हायकोर्टात झालेल्या सुनावणीत कोर्टाने काही स्पष्ट निर्देश हे राज्य सरकारला दिले आहेत. ज्यानंतर याचबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना मोठं विधान केलं आहे. 'सरकारचा प्रयत्न असतो की, सामंजस्याने गोष्टी झाल्या पाहिजेत. त्यामुळे सरकार सामंजस्याची भूमिका घेते. पण एकदा कोर्टाने कडक आदेश दिल्यानंतर ज्या प्रकारची कारवाई केली पाहिजे ती आता प्रशासनला करावीच लागेल.' अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. ते पुण्यात बोलत होते.

मराठा आरक्षणासाठी आग्रही असलेले मनोज जरांगे हे सध्या मुंबईती आझाद मैदानावर आमरण उपोषण करत आहेत. अशावेळी आंदोलकांकडून मात्र, काही ठिकाणी रास्ता रोको, गाड्या अडवणे असे प्रकार केले जात असल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आले. ज्याबाबत कोर्टाने सरकारला निर्देश दिले आहेत. ज्यानंतर याबाबत देवेंद्र फडणवीस यांना सरकारच्या भूमिकेबाबत विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. पाहा ते नेमकं काय म्हणाले.

पाहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले

'कायदेशीर मार्ग काढण्याची आमची मानसिकता'

'मी प्रवासात असल्यामुळे कोर्टाने नेमकं काय म्हटलंय ते मी ऐकलेलं नाही. पण मला जे समजलं त्यात हेच समजलं की, जी काही परवानगी होती ती काही अटी-शर्थींसह होती. त्याचं उल्लंघन झालेलं आहे. विशेषत: रस्त्यावर ज्या गोष्टी चालल्या आहेत त्या संदर्भात कोर्टाने प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. काही निर्देश दिले आहेत. जे काही कोर्टाचे निर्देश आहेत त्याचं पालन करणं हे प्रशासनाला क्रमप्राप्त आहे. प्रशासन कोर्टाच्या निर्देशाचं उचित पालन करेल.'

हे ही वाचा>> Maratha Reservation: 'मुख्यमंत्री मराठा नाही म्हणून हे घडतं आहे', सदावर्तेंचा हायकोर्टात खळबजनक दावा

'बैठकीत सगळ्या कायदेशीर बाबींचा विचार केला. त्यानंतर याबाबत जे काही मार्ग काढता येतील.. ते मार्ग काढत असताना ते कोर्टात कसे टिकतील या संदर्भातील चर्चा झाली आहे. या प्रकरणी कायदेशीर मार्ग काढण्याची आमची मानसिकता आहे. त्यावरच आमचं काम सुरू आहे.' 

हे वाचलं का?

    follow whatsapp