Prakash Ambedkar: शरद पवार-आंबेडकरांची ‘चाय पे चर्चा’, नव्या चर्चेला उधाण

मुंबई तक

यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट झाल्यानंतर राजकीय चर्चांना आता उधान आले आहे. इंडिया आणि महाविकास आघाडी विषयी काही चर्चा झाल्या का असं विचारल्यानंतर मात्र प्रकाश आंबेडकर यांनी दिलखुलास असं उत्तर दिलं आहे.

ADVERTISEMENT

meeting of prakash amdekar and sharad pawar political talks did not discuss India alliance no comment
meeting of prakash amdekar and sharad pawar political talks did not discuss India alliance no comment
social share
google news

Pawar-Ambedkar meeting: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण वेगवेगळ्या मुद्यांनी ढवळून निघत आहे. त्यातच आज शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधान आले आहे. मुंबईतील आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये (Yashwantrao chavan center) डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांच्या प्रॉब्लेम ऑफ रूपी या पुस्तकाला शंभर वर्षे झाल्याबद्दल कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्या कार्यक्रमाच्यानिमित्ताने शरद पवार (Sharad Pawar) आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) एकत्र आले होते. त्या भेटीवर बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांच्या अनेक प्रश्नावर बोलताना त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवरही जोरदार निशाणा साधला.(meeting of prakash amdekar and sharad pawar political talks did not discuss India alliance no comment)

प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी बोलतान सांगितले की, आज शरद पवार यांच्याबरोबर भेट झाली असली तरी त्याच वेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबर आज वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. त्यांच्यासोबतच इतर 12 जणही उपस्थित होते. त्यांच्याबरोबरही वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

हे ही वाचा >> Gaganyaan : इस्रोने रचला इतिहास, गगनयानच्या क्रू मॉड्यूलची यशस्वी चाचणी!

‘इंडिया’विषयी निर्णय घेणार

आजच्या कार्यक्रमाच्यानिमित्ताने प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीविषयी काही चर्चा झाली का असं विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले की, आजच्या कार्यक्रमात त्यावर चर्चा झाली नसली तरी काही दिवसांपूर्वी त्याविषयी आमची चर्चा झाली होती. त्यामुळे आता पाच राज्यांच्या निवडणुकांविषयी आणि देशातील निवडणुकांवर थोड्याच दिवसात चर्चा करुन निर्णय घेतला जाणार असंही त्यांनी यावेळी सांगितले.

जरांगे-पाटील सरकारच्या अंगलट

यशवंतराव चव्हाण सेंटरमधील कार्यक्रमामध्ये प्रकाश आंबेडकर यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी कॉफी दिली. त्यावेळी कॉफी गोड होती का यावर ते म्हणाले की, कॉफीमध्ये साखर टाकून गोड करण्यात आली होती असंही त्यांनी दिलखुलासपण उत्तर दिले. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणावरुन सरकारचे कान टोचले आहेत. सरकारकडून ज्या प्रकारे त्यांना मनोज जरांगे पाटील यांनी वेळ दिला जात आहे. त्यांच्याविषयी ज्या प्रकारे चालढकल केली जात आहे. हे सरकारचं वागणं त्यांच्या अंगलट येऊ शकतं असा इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp