No-Confidence Motion: ‘मोदीजी, तुम्ही मणिपूरमध्ये भारताची हत्या केली’, राहुल गांधींनी लोकसभा हादरवली!

रोहित गोळे

ADVERTISEMENT

no confidence motion in lok sabha rahul gandhi criticized pm modi said you killed india in manipur
no confidence motion in lok sabha rahul gandhi criticized pm modi said you killed india in manipur
social share
google news

Rahul Gandhi Lok Sabha Speech: नवी दिल्ली: लोकसभेत मोदी सरकारवर (Modi Govt) आणण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर (No-Confidence Motion) सलग दुसऱ्या दिवशी चर्चा सुरू आहे. आज (9 ऑगस्ट) कामकाजाला सुरुवात होताच काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाषण केलं. सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना त्यांची खासदारकी बहाल केल्यानंतर आज पहिल्यांदा त्यांनी लोकसभेत भाषण केलं. यावेळी मणिपूरच्या (Manipur) मुद्द्यावरून मोदी सरकारला अक्षरश: सळो की पळो करुन सोडलं. त्यांच्या भाषणावेळी सत्ताधारी खासदारांनी अनेकदा गदारोळ केला. मात्र, तरीही राहुल गांधींनी हल्लाबोल करणं सोडलं नाही. यावेळी त्यांनी थेट मोदींवर असा आरोप केला की, त्यांनी मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केली. (no confidence motion in lok sabha rahul gandhi criticized pm modi said you killed india in manipur marathi political news)

राहुल गांधींनी भाषणाची सुरुवात आपल्या भारत जोडो यात्रेच्या अनुभवाने केली. पण त्यांचा संबंध त्यांनी मणिपूरमध्ये सध्या जी हिंसा सुरू आहे त्याच्याशी जोडत मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली.. त्यांच्या या भाषणाने त्यांनी लोकसभा अक्षरश: हादरवून सोडली.

‘मोदीजी तुम्ही भारतमातेची हत्या केली..’

मणिपूरमध्ये बोलताना राहुल गांधी म्हणाले की, ‘भारत हा एक आवाज आहे.. जर आपल्याला तो आवाज ऐकायचा असेल तर.. आपल्याला अंहकार आणि द्वेष मिटवावा लागेल.. काही दिवसांपूर्वीच मी मणिपूरला गेलो.. आपले पंतप्रधान नाही गेले.. आजवर गेलेले नाही.. कारण त्यांच्यासाठी मणिपूर हा हिंदुस्तान नाहीए. मी मणिपूर शब्दप्रयोग केला.. पण आजचं सत्य हे आहे की, मणिपूर शिल्लक राहिलेलं नाही.. मणिपूरला आपण दोन भागात विभागलं आहे, तोडलं आहे..’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> No-Confidence Motion: ‘…तर मी तुमची औकात काढेल’, राणेंनी लोकसभेत का वापरले असे शब्द?

‘मी मणिपूरमध्ये मदत छावणीमध्ये गेलो.. मी महिलांशी बोललो, मुलांशी बोललो.. जे आपले पंतप्रधानांनी नाही केलं.. मी अनेक महिलांशी तिथे बोललो.. पण मी दोन उदाहरणं देतो.. एका महिलेला मी विचारलं की, तुमच्यासोबत काय झालं? ती महिला म्हणाली, माझा एकच छोटा मुलगा होता. माझ्या डोळ्यासमोर त्याला गोळी घातली. आपण विचार करा.. आपल्या मुलांबाबत विचार करा..’

‘मी संपूर्ण रात्रभर त्याच्या मृतदेहाजवळ झोपून होते.’ (खोटं.. सत्ताधारी पक्षातील खासदाराने यावर टिप्पणी केली.. त्यावर राहुल गांधी म्हणाले, खोटं नाही.. खोटं तुम्ही बोलतात.. मी नाही..)

ADVERTISEMENT

‘मी त्याच्या मृतदेहासोबत झोपून राहिले.. नंतर मला भीती वाटली, मी माझं घर सोडलं. जे माझ्याजवळ होतं, ते सगळं सोडून दिलं. मी त्या महिलेला विचारलं काहीतरी आणलं असेल? त्या महिलेनं सांगितलं, काहीच नाही. माझ्याजवळ फक्त कपडे आहेत. तिने इकडे तिकडे शोधलं आणि एक फोटो दाखवला आणि म्हणाली इतकंच माझ्याजवळ राहिलं आहे.’

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> No Confidence Motion : नंबर गेम, ‘इंडिया’ची स्ट्रॅटजी, तुमच्या 10 प्रश्नांची उत्तरे

‘आणखी एक उदाहरण.. मी दुसऱ्या मदत छावणीत गेलो. मी त्या महिलेला विचारलं की, तुमच्यासोबत काय झालंय? मी प्रश्न विचारताच ती महिला थरथरायला लागली. तिच्या डोळ्यासमोर ते चित्र उभे राहिले आणि ती बेशुद्ध झाली. माझ्यासमोर ती बेशुद्ध झाली.. मी फक्त ही दोन उदाहरणे दिली आहेत.’

‘अध्यक्ष महोदय, यांनी मणिपूरमध्ये भारताची हत्या केलीये फक्त मणिपूरची नाही. यांच्या राजकारणाने मणिपूरला नाही तर भारताला मणिपूरमध्ये मारलंय. भारताची हत्या केलीए, भारताचा खून केला आहे मणिपूरमध्ये..’ (यानंतर सत्ताधारी आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला. तर विरोधी आमदार देखील वेल उतरले.)

‘जसं मी भाषणाच्या सुरुवातीलाच म्हणालो की, भारत एक आवाज आहे. त्या आवाजाची हत्या तुम्ही मणिपूरमध्ये केली. याचा अर्थ भारतमातेची हत्या तुम्ही मणिपूरमध्ये केली. तुम्ही मणिपूरच्या लोकांना मारलं. मणिपूरच्या लोकांना मारुन तुम्ही भारताची हत्या केली आहे. तुम्ही देशद्रोही आहात, तुम्ही देशभक्त नाही.. तुम्ही देशप्रेमी नाही तर देशद्रोही आहात. तुम्ही देशाची हत्या मणिपूरमध्ये केली.’

‘यामुळेच तुमचे पंतप्रधान मणिपूरमध्ये जाऊ शकत नाही. कारण त्यांनी देशाची हत्या केली आहे मणिपूरमध्ये.. मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केली आहे. तुम्ही भारतमातेचे रक्षणकर्ते नाही आहात.. आपण भारतमातेचे खुनी आहात..’ अशा शब्दात राहुल गांधींनी अतिशय आक्रमकपणे मणिपूरच्या मुद्द्यावरुन सरकारवर टीकेची झोड उठवली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT