‘आव्हाडांसह 2-3 जण प्रफुल्ल पटेलांवर तुटून पडले’,छगन भुजबळांनी सांगितली इनसाईड स्टोरी

मुंबई तक

ADVERTISEMENT

chhagan bhujbal says praful patel had proposed supriya sule name for ncp president
chhagan bhujbal says praful patel had proposed supriya sule name for ncp president
social share
google news

Politics Of Maharashtra : शरद पवारांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर रंगलेलं नाट्य महाराष्ट्राने आणि देशाने बघितलं. यावेळी सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करण्याची मागणीही काही नेत्यांनी केली. याच मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली होती. त्याबैठकीत काय घडलं होतं, याबद्दल छगन भुजबळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना ‘सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वावर या सगळ्या आमदारांना विश्वास नव्हता का? सुप्रिया सुळेंपेक्षा अजित पवार हा पक्ष पुढे घेऊन जातील असं आमदारांना वाटत होतं का?’

वाचा >> 30 जून! अजित पवारांच्या ‘या’ बैठकीतच झाला शरद पवारांना धक्का देण्याचा प्लॅन

भुजबळ म्हणाले, “सुरुवातीला जेव्हा साहेबांनी (शरद पवार) राजीनामा दिला. तेव्हा सुरूवातीलाच मी हा मुद्दा मांडला होता. साहेबांनी (शरद पवार) मला दुसऱ्या दिवशी विचारलं की, तुम्ही तर एकदम वाटणी करून टाकली. मी त्यांना म्हणालो की, काय करणार साहेब? तुम्ही निर्णय जाहीर करता आणि आम्हाला सांगत नाही. त्यामुळे आम्हाला काय वाटतं हे आम्ही तुम्हाला सांगत नाही आणि जाहीर करून टाकतो.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

“मी काय जाहीर केलं होत? मी म्हणालो होतो की, सुप्रिया सुळे दिल्लीत सर्वांच्या ओळखीच्या आहेत. अध्यक्षा म्हणून त्या काम करतील. महाराष्ट्राचं काम हे अजित पवार करतील. काय चुकलं होतं? हेच तर मी बोललो होतो. कुठे प्रश्न आला होता?”, असा उलट सवाल भुजबळ यांनी केला.

भुजबळांनी सांगितला बैठकीत घडलेला घटनाक्रम

या बैठकीबद्दल भुजबळ म्हणाले, “तीन दिवसांनी माघार घेतली. मी हेही सांगितलं होतं की, त्यांना कार्याध्यक्ष म्हणून नियुक्त करूया. तुमच्यावरील भार कमी होईल. तीन दिवसांनी असं काय झालं की, साहेबांनी वायबी चव्हाण सेंटरमध्ये पुस्तक प्रकाशन सोहळ्यात अचानक जाहीर केलं. त्यानंतर तीन दिवसांनी जाहीर केलं की, राजीनामा मागे घेतो. त्याच्या आदल्या दिवशी साहेबांनी सांगितलं होतं की, नेतेमंडळी निर्णय घ्या. त्यामध्ये पीसी चाको, जयंत पाटील आम्ही 15-16 लोक तिथे बसलेलो होतो. प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुनील तटकरे हे सगळे होते.”

ADVERTISEMENT

दोन पत्रांमध्ये काय लिहिलेलं होतं?

“आम्ही दोन पत्र तयार केली होती. पहिलं पत्र असं होतं की, शरद पवारांना विनंती करायची की त्यांनी राजीनामा मागे घ्यावा. दुसरा मायना आम्ही असा केला होता की, पवारसाहेबांना विनंती करावी की राजीनामा मागे घ्यावा आणि जर घेत नसाल, तर सुप्रिया सुळे यांच्याकडे जबाबदारी द्यावी. हा मुद्दा आम्ही मांडला”, अशी माहिती छगन भुजबळ यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

वाचा >> शरद पवारांनी अजित पवारांना सांगितलं भाजप आणि शिवसेनेचं हिंदुत्व कसं वेगळं?

“प्रफुल्ल पटेलांनीही हा मुद्दा मांडला. त्यावेळी दोन-तीन लोक प्रफुल्ल पटेलांवर तुटून पडले. हे मांडून जणूकाही फार मोठा गुन्हा केला. तुम्ही सुप्रिया सुळेंचं नाव अध्यक्षपदासाठी का केलं? ते चाको म्हणाले नाही… नाही, चुकीचं आहे. कार्यकारिणी ठरवणार. जयंतराव पाटील… त्यांच्यापेक्षा जास्त ते जितेंद्र आव्हाड… ते तर अधिक जोराने तुटून पडले. हे असं का बोलता तुम्ही. सुप्रिया सुळेंचं नाव घ्यायचंच नाही, असं म्हणाले. प्रत्येकवेळी आम्ही जे करतो ते चूक आणि मग नंतर तेच करायचं. मला काही कळलं नाही”, असं म्हणत भुजबळ यांनी शरद पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीकास्त्र डागलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT