पोलिसांचा ड्रग्जप्रकरणी 'तो' व्हिडिओ, राज ठाकरेंनी धरलं धारेवर

मुंबई तक

Raj Thackeray : "माझ्याकडे नुकताच एक व्हिडिओ आलेला आहे, एका पोलिसांच्या गाडीत मुले होती, त्या मुलांना पोलीस म्हणतात की, जर या परिसरात दिसलात तर खिसात तुमच्या 50 ग्रॅमची पाऊडर टाकेन. आता पाऊडर पण मिळायला लागली का? हा पोलीस कोण ड्रग्स सप्लायर्स आहे का? हे काय सुरूये मला कळत नाहीये, असं म्हणत त्यांनी पोलिसांच्या कामावर प्रश्न उपस्थित केला आहे.

ADVERTISEMENT

Raj Thackeray
Raj Thackeray
Google CTA

बातम्या हायलाइट

point

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे? 

point

उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल 

Raj Thackeray : "माझ्याकडे नुकताच एक व्हिडिओ आलेला आहे, एका पोलिसांच्या गाडीत मुले होती, त्या मुलांना पोलीस म्हणतात की, जर या परिसरात दिसलात तर तुमच्या खिशात 50 ग्रॅमची पाऊडर टाकेन. आता पाऊडर पण मिळायला लागली का? हा पोलीस कोण ड्रग्स सप्लायर आहे का? हे काय सुरूये मला कळत नाहीये. पेपरफुटीप्रकरणात कोण आहेत, त्यांना अटक करावी. हे होणार नाही, याची शाश्वती द्यावी. हे प्रकरण इथवरं आलंच नसतं," असं म्हणत राज ठाकरे यांनी  आज 23 जुलै 2026 रोजी मुंबईत पत्रकार परिषद घेत पोलीस यंत्रणेसह सत्ताधाऱ्यांवर टिकेची तोफ डागली.  

हे ही वाचा : विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवरून ठाकरे बंधू आक्रमक; 26 जुलैला मुंबईत भव्य मोर्चाची घोषणा!

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे? 

"गेली काही दिवसांपासून विद्यार्थ्यांचं दिल्लीत आंदोलन सुरू आहे, तेच आंदोलन चिरडलं जाण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या पद्धतीने मुलांना-मुलींना मारहाण केली जाते, याचेच पडसाद आता देशभरात उमटू लागल्याचं चिन्ह आहे. महाराष्ट्रासह मुंबईत देखील पडसाद उमटू लागले होते. जेव्हा रझा अकादमीच्या वेळी आम्ही मोर्चा काढला होता, तेव्हा आम्ही मुंबई पोलीस कमिश्नर यांचा राजीनामा मागितला होता, तेव्हा त्यांनी काँग्रेस सरकारच्या काळात राजीनामा दिला", असं राज ठाकरे म्हणाले 

पुढे ते म्हणाले की, "जेव्हा मुंबईवर बॉम्बस्फोट झाला होता, तेव्हा आर.आर. आबा हे गृहमंत्री होते, ते म्हणाले की, बडे बडे शहरो मे छोटी छोटी बाते होती रहती है! त्या वाक्यावरून त्यांना गृहमंत्रीपदावरून टाकलं जातं. जेव्हा तुम्ही ज्या पदावर असता, त्या पदातून तुम्हाला अपयश आलेलं असतं, त्याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे हीच मागणी या मुलांची आहे", असं ते म्हणाले. 

'तीन वेळा पेपरफुटी'

"पहिल्यांदा नीटचे पेपर फुटलेत असं नाही, तीन वेळा पेपरफुटी झालेली आहे. आम्हीच सांगितलं की, केंद्रीय पद्धतीनुसार अशा परीक्षा घेऊ नका. सत्ताच एवढं होती की, त्यांची तेव्हाही ऐकायची नव्हती आणि आजही नाही. मागणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनाम्याची होती, मात्र आता ती मागणी तेवढीच राहिली नाही, पंतप्रधानांपर्यंत पोहोचली आहे. आज पंतप्रधान यांनी ट्विट केलंय, त्या ट्विटला काही एक अर्थ उरलेला नाही", असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला. 

हे वाचलं का?