Ajit Pawar : पवारांची नक्कल, भाजपला घेतलं फैलावर; ठाकरेंनी धुतलं
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेवर बोलताना भाजपला फैलावर घेतले. राज ठाकरेंनी अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवरही चांगलेच सुनावले.
ADVERTISEMENT

Raj Thackeray Fulle Speech : मुंबई-गोवा महामार्गाची दुरावस्था झालीये. या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. यासंदर्भात राज ठाकरेंच्या उपस्थितीत निर्धार मेळावा पनवेलमध्ये पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी अजित पवारांपासून ते भाजपपर्यंत सगळ्यांचाच समाचार घेतला.
राज ठाकरे पनवेलमधील मेळाव्यात काय बोलले?
1) आज मी इथं मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेविरुद्धच्या आंदोलनाला झेंडा दाखवायला आलोय. कधी कधी वाटतं चांद्रयान करून काय फायदा? चंद्रावर जाऊन खड्डेच पहायचेत तर महाराष्ट्रात पाठवायचं ना.. खड्डे इथे पण दिसले असते आणि खर्च पण वाचला असता. अहो, आपण चंद्रावर जाऊ शकतो पण महाराष्ट्रात रस्ते चांगले बंधू शकत नाही का?
2) २००७ ला मुंबई-गोवा हायवेचं काम सुरु झालं, त्यानंतर इतकी सरकारं आली पण रस्त्याचं काम झालंच नाही आणि तरीही त्याच लोकांना निवडून कसं दिलं जातं? रस्ते खड्ड्यात गेले काय आणि आपण खड्ड्यात गेलो काय आपल्या मतदारांना काहीच वाटत नाही?
वाचा >> ‘दुसऱ्यांचे आमदार न फोडता स्वत:चा..’, राज ठाकरेंनी भाजपला झोडपलं!
3) फक्त कोकणातलेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. मुंबई ते नाशिक जायला ८ तास लागतात… लोकांचे ह्या रस्त्यानी शब्दशः हाल केलेत. काय चाललं आहे महाराष्ट्राचं?