One Nation One Election वरून संजय राऊत संतापले; मोदींना म्हणाले, ‘फुगा…’

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Sanjay Raut attacks on narendra modi after Centre government forms panel on 'One Nation, One Election' under former President Kovind.
Sanjay Raut attacks on narendra modi after Centre government forms panel on 'One Nation, One Election' under former President Kovind.
social share
google news

Sanjay Raut on One Nation One Election : ‘इंडिया’ आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू असतानाच मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. वन नेशन, वन इलेक्शन घेण्यासाठी सरकारने पहिले पाऊल टाकलं असून, समितीही स्थापन केली आहे. यावरून शिवसेनेचे (युबीटी) खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केलाय.

मुंबईत माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “मोदी सरकारने एक नवा फुगा हवेत सोडला आहे, वन नेशन वन इलेक्शन. त्याच्या आधी एक संविधान, एक विधान वगैरे… काय झालं जम्मू काश्मीरला? तिथे आधी इलेक्शन घ्या. मणिपूरमध्ये घ्या. वन नेशन, वन इलेक्शन आधी या देशात निष्पक्ष आणि पारदर्शी निवडणुका व्हायला हव्यात.”

“भ्रष्ट निवडणूक आयोग या देशात काम करतोय. तो दूर केला पाहिजे. दबावाखाली काम करणारा भ्रष्ट निवडणूक आयोग जोपर्यंत आहे, तोपर्यंत या देशात पारदर्शी निवडणुका होणार नाही. त्यामुळे वन नेशन, वन इलेक्शन राजकीय फंडे आहेत”, असे राऊत म्हणाले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> केंद्रीय मंत्र्याच्याच घरात तरुणाची गोळ्या झाडून हत्या, नेमकं काय घडलं?

“वन नेशन, वन इलेक्शन’, हे काय आहे? देश तर एकच आहे ना? कुणाच्या मनात शंका आहे का? या देशात जर कुणी वेगळ्या गोष्टी करतात. तसं तर एक देश एक संविधान असंही आपण म्हणतो. एक देश एक निवडणूक ठिक आहे, पण निष्पक्ष निवडणुका घ्या, अशी आमची मागणी आहे. कारण या देशात ते होत नाहीये”, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.

Sanjay Raut : “राष्ट्रपती होते, तेव्हा लक्ष दिलं नाही”

“मला असं वाटतं की निवडणुका पुढे ढकलण्यासाठी हे एक षडयंत्र आहे. या लोकांना निवडणुकाच घ्यायच्या नाहीत. रामनाथ कोविंद जेव्हा राष्ट्रपती होते, तेव्हा त्यांच्याकडे या सरकारने लक्ष दिलं नाही. निवृत्त झाल्यानंतर त्यांच्यावर जबाबदारी दिलीये”, असा घणाघात राऊतांनी मोदी सरकारवर केला.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> “देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार नाही, कारण…”, शाह यांचं नाव घेत सुषमा अंधारेंनी काय सांगितलं?

“हे लोक ‘इंडिया’ला घाबरले आहेत. बिथरले आहेत. त्यांच्या मनात भीती आहे. त्यामुळे दररोज नवनवे फंडे घेऊन येतात. आमची मीटिंग सुरू आहे, त्यावरून लक्ष हटवण्यासाठी हे सगळं केलं गेलं आहे”, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

“मोदी अधिवेशन असतं तेव्हा येत नाही”

“आता लोकांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवलं आहे. काय गरज आहे? जेव्हा अधिवेशन असते, तेव्हा पंतप्रधान (नरेंद्र मोदी) येत नाहीत. अधिवेशन असते तेव्हा सरकारकडून कामकाज होऊ दिलं जात नाही. आता कोणता अमृतकाळ आलाय की, अधिवेशन बोलवलं आहे आणि तेही गणेशोत्सवात”, असं राऊत यावेळी म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT