संजय राऊतांचा फडणवीस, शेलारांना ‘जालीम डोस’! दाखवला वाजपेयी-आडवाणींचा व्हिडीओ
पुन्हा एकदा बाबरी मशीद पाडण्याच्या श्रेयावरून भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेत वाद शिलगला आहे. दोन्ही बाजूंनी वेगवेगळे दावे केले जाताहेत. संजय राऊत यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत बाबरी मशीद पाडल्यानंतर लालकृष्ण आडवाणी, अटलबिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरेंनी केलेल्या विधानांचे व्हिडीओ आहेत.
ADVERTISEMENT

Babri Masjid Demolition Ram Mandir Shiv sena bjp Politics : राम मंदिरात मूर्तींची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे. या मुद्द्यावरून पुन्हा एकदा बाबरी मशीद पाडण्याच्या श्रेयावरून भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेत वाद शिलगला आहे. दोन्ही बाजूंनी वेगवेगळे दावे केले जाताहेत. एकीकडे बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळी घेतलेल्या भूमिकेचा दाखला ठाकरेंच्या सेनेकडून दिला जातो. तर भाजपकडून बाबरी मशीद पाडण्याचे श्रेय घेतले जात आहेत. यावरून शिलगलेला वाद नव्या वळणावर आला आहे. (Sanjay Raut reply to devendra fadnavis, ashish shelar, girish mahajan. raut shares video of atal bihari vajpayee and lal krishna advani statements after babri masjid demolition)
देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन आणि आशिष शेलार यांनी केलेल्या विधानांना आणि मांडलेल्या भूमिकेला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. संजय राऊत यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत बाबरी मशीद पाडल्यानंतर लालकृष्ण आडवाणी, अटलबिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरेंनी केलेल्या विधानांचे व्हिडीओ आहेत.
फडणवीस, महाजन, शेलार काय बोललेत?
संजय राऊत यांनी भाजपच्या तिन्ही नेत्यांना उत्तर दिलं आहे. त्यांनी अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांची विधान व्हिडीओतून दाखवली आहेत. ते बघण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन आणि आशिष शेलार नेमकं काय म्हणाले, ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
फडणवीस म्हणाले आहेत की, “मी काही लोकांची पर्वाच करत नाही. जेव्हा कारसेवा करायची होती, तेव्हा हे लोक लपून बसले होते. हे कुणीही कारसेवेसाठी गेले नाहीत. मी त्यांच्यावर काय बोलायचं? आम्ही कारसेवक आहोत आणि त्याचा अभिमान आहे. तिन्ही कारसेवांमध्ये मी गेलो होतो. मी बदायूच्या तुरुंगात गेलो आहे. जेव्हा कलंकित ढाचा पाडला गेला, तेव्हा मी तिथे उपस्थित होतो. आता काही लोक जळतात कारण ते घाबरुन घरी बसले होते. मी त्यांच्याविषयी कशाला बोलायचं?”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केलीये.