Sanjay Raut : "फडणवीस व सोमय्यांना कोणत्या चौकात चाबकाने मारायचे?", राऊतांचा हल्ला

मुंबई तक

ADVERTISEMENT

खासदार संजय राऊत यांची नरेंद्र मोदींसह अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांवर टीका.
Sanjay Raut hits out at Fadnavis, modi, Shah And kirit Somaiya
social share
google news

Sanjay Raut Ashok Chavan Devendra Fadnavis : अशोक चव्हाणांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर भाजपने त्यांना पक्षात घेऊन राज्यसभेवर पाठवले. याच मुद्द्यावरून खासदार संजय राऊतांनी रोखठोकमध्ये भाजपला रोकडा सवाल केला आहे.  देवेंद्र फडणवीसांना वाटाणा म्हणत राऊतांनी टीकेचे बाण डागले. 

'राम लहर संपली! आता राम नाम सत्य है!', या रोखठोक लेखात राऊतांनी भाजपवर टीका केली आहे. "आडवाणींपासून महाराष्ट्रात माधव भंडारींपर्यंत भाजपची जुनी माणसे अडगळीत गेली व काल आलेल्या अशोक चव्हाणांना शुद्ध करून राज्यसभेवर घेतले. ‘राम लहर’ ओसरल्याचा हा सर्वात मोठा पुरावा", असं म्हणत राऊतांनी मोदी-शाहांबरोबरच देवेंद्र फडणवीसांनाही लक्ष्य केलं. 

संजय राऊतांचे भाजपवर वाक्'बाण', काय म्हटलंय?

खासदार संजय राऊत रोखठोकमध्ये म्हणतात, "संसदेत अमित शहा यांनी 'आदर्श' घोटाळ्यावर गुळण्या टाकल्या. पंतप्रधान मोदी यांनी स्वत: नांदेडला येऊन 'आदर्श'मधील घोटाळ्याने कारगिलमधील शहिदांचा कसा अपमान झाला यावर प्रवचन झोडले. शहिदांचा हा अपमान आम्ही सहन करणार नसल्याचे जाहीर केले."

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

"देवेंद्र फडणवीस या 'आदर्श' भ्रष्टाचारावर तापलेल्या तव्यावरील वाटाण्यासारखे ताडताड उडताना महाराष्ट्राने पाहिले. हा वाटाणा आता शांत झाला. देवेंद्र फडणवीस यांनीच अशोक चव्हाण यांचा प्रवेश भाजपात करून घेतला", असं म्हणत राऊतांनी भाजपच्या तीन महत्त्वाच्या नेत्यांना सुनावलं. 

अशोक चव्हाणांवरून फडणवीसांना घेरलं

"अशोक चव्हाण यांना  फोडल्याने काँग्रेसचे किती नुकसान झाले ते सांगता येत नाही, पण भाजपची उरलीसुरली इज्जतही मातीमोल झाली. 'अशोक चव्हाण हे लीडर नसून डीलर आहेत,' असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी घातला होता. आज त्याच 'डीलर'शी फडणवीस यांना डील करावे लागले", असे म्हणत राऊतांनी फडणवीसांना घेरलं. 

ADVERTISEMENT

पुढे त्यांनी म्हटलं आहे की, "चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने भाजपला अनैतिकतेचे सुतक लागले व ते त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते. मुंबईतील भाजपचे नेते आशीष शेलार यांना पत्रकारांनी चव्हाण यांच्या आदर्श घोटाळ्याविषयी प्रश्न विचारताच ते त्या प्रश्नकर्त्यावरच भडकले व मी तुम्हाला उत्तर देणार नाही, असे सांगून पळून गेले. महाराष्ट्रातील भाजपचा राजकीय कुंटणखाना बंद होण्याची ही सुरुवात आहे", अशी घणाघाती टीका त्यांनी केली. 

ADVERTISEMENT

राऊत म्हणतात, "2014 च्या निवडणुकीत महाराष्ट्रात ज्या ज्या मोठ्या घोटाळ्यांवर भाजपने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला घेरले व बदनाम केले ते घोटाळ्यांचे सर्व सूत्रधार आज भाजपच्या तंबूत आहेत."

"छगन भुजबळ – महाराष्ट्र सदन घोटाळा, अजित पवार – सिंचन, शिखर बँक घोटाळा, अशोक चव्हाण – आदर्श घोटाळा, या तिन्ही नेत्यांना तुरंगात टाकण्याची भाषा फडणवीस व किरीट सोमय्यासारखे लोक करीत होते. त्यांचा खोटेपणा उघडा पडला. एक तर हे लोक भ्रष्टाचाराचे आरोप खोटेच करीत होते किंवा भाजपात येताच हा भ्रष्टाचार स्वच्छ झाला. छगन भुजबळ यांच्या भ्रष्टाचाराची फाईल आता ‘ईडी’ला सापडत नाही, असे ईडीने न्यायालयात सांगितले. अजित पवार यांना त्यांच्या प्रकरणात ‘क्लीन चिट’ मिळाली. मग आता आरोप करणाऱ्या फडणवीस व सोमय्या यांना कोणत्या चौकात चाबकाने मारायचे?", असा रोकडा सवाल राऊत यांनी भाजपला केला आहे. 

भाजपला म्हणाले राजकीय कुंटणखाना

रोखठोकमध्ये राऊतांनी भाजपचा उल्लेख राजकीय कुंटणखाना असा केला आहे. ते म्हणतात, "भारतीय जनता पक्षाच्या पायाखाली जमीन राहिलेली नाही. ते खरे सत्य आता उघड झाले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही ‘चारशे पार’ जागा जिंकू हा मोदींचा बुडबुडा फुटला. एक नांदेडची जागा जिंकण्यासाठी मोदी यांना शहिदांचा अपमान करणाऱया चव्हाणांना भाजपात घ्यावे लागले. जिंकण्याची इतकीच गारंटी असती तर भाजपने त्यांच्या राजकीय कुंटणखाण्याचा असा विस्तार केला नसता." 

"मोदी-शहांना खात्री आहे, ते निवडणुका हरत आहेत. त्यामुळे भ्रष्ट, गुंड, झुंड यांची मोट बांधून ते निवडणुका लढणार आहेत. हरण्याची भीती व त्यातून निर्माण झालेले वैफल्य इतक्या टोकाला गेले आहे की, ते दाऊदच्या टोळय़ांनाही भाजप कार्यालयात प्रवेश देतील व मूळ भाजपवाल्यांना त्या टोळ्यांसाठी सतरंज्या अंथरायला सांगतील", असे बोल राऊतांनी सुनावले आहेत. 

"भाजप 190 जागाच मिळतील"

"अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेची लाट उसळेल व त्या लाटेवर स्वार होऊन निवडणुका जिंकू या भ्रमाचा भोपळादेखील फुटला. श्रीरामाच्या नावाने निर्माण केलेली कृत्रिम लहर 72 तासही टिकली नाही व भाजप पुन्हा अडचणीत आला. भाजप व त्यांचे ओढून निर्माण केलेले मित्रपक्ष 200 जागा तरी जिंकतील काय? याची खात्री संघाच्या लोकांना वाटत नाही. मोदी व त्यांचा पक्ष 190 पर्यंत थांबेल असे संघाचे सर्वेक्षण सांगते", असा दावा राऊत यांनी केला आहे. 

"ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, ज्यांना तुरंगात टाकण्यासाठी जंग जंग पछाडले, भ्रष्टाचाराचे आरोप करून ज्यांना पदावरून राजीनामा देण्यास भाग पाडले असे सगळे लोक आज भाजपात आहेत व फडणवीस त्यांच्या स्वागतासाठी भाजप कार्यालयात सतरंज्या घालीत आहेत. यापेक्षा अध:पतन ते काय असू शकते?", असे म्हणत राऊत यांनी भाजपला भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून चांगलंच सुनावलं आहे. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT