देवेंद्र फडणवीसांनी ‘गद्दारी’वरून डिवचले, शरद पवारांनी काढला सगळा इतिहास

मुंबई तक

ADVERTISEMENT

maharashtra politics : sharad pawar slams devendra fadnavis
maharashtra politics : sharad pawar slams devendra fadnavis
social share
google news

Sharad Pawar Vs Devendra Fadnavis : “1978 मध्ये वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातून शरद पवार आमदार घेऊन बाहेर पडले आणि भाजपसोबत मुख्यमंत्री झाले. त्यांनी केली तर ती मुत्सद्देगिरी आणि तेच शिंदे यांनी केले तर गद्दारी? हा कुठला न्याय”, असा सवाल करत उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना डिवचलं. फडणवीसांनी केलेल्या याच विधानाला उत्तर देताना पवारांनी फडणवीसांना इतिहास सांगितला.

शरद पवार यांनी बारामती येथे माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी पाटण्यात झालेल्या विरोधी पक्षाच्या बैठकीत झालेल्या चर्चेबद्दल माहिती दिली. त्याचबरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या विधानावर पवारांनी सडकून टीका केली.

भाजपची टीका, पाटण्यातील बैठकीवर पवार म्हणाले…

विरोधी पक्षाच्या पाटण्यातील बैठकीवर 19 पक्षाचे पंतप्रधान एकत्र आले होते, अशी भाजपकडून टीका केली गेली. यावर शरद पवार म्हणाले, “अशा प्रकारचं जे भाष्य करतात, ते पोरकटपणाचं भाष्य आहे. या संबंध बैठकीत पंतप्रधानपदाबद्दल चर्चा सुद्धा झाली नाही. चर्चा झाली ती, महागाई, बेरोजगारी आणि काही ठिकाणी सामाजिक घडी बिघडवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला. समाजासमाजामध्ये अंतर कसं होईल, याची खबरदारी घेण्यासाठी भाजप पावलं टाकत आहे. कुठल्याही राज्यात जाती, धर्म यातून मतभेद वाढले तर समाजाच्या दृष्टीने ते चांगले नाहीत. त्यासाठी या सगळ्या गोष्टींना आवर घालण्यासाठी आपण एकत्र बसण्याची गरज आहे, हा चर्चेचा विषय होता.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> मविआ की युती… महाराष्ट्रात बीआरएस, वंचित बहुजन आघाडी कुणासाठी घातक?

चंद्रशेखर बावनकुळेंना पवारांचे खडेबोल

“गेल्या दोन-तीन दिवसांपासून मी बघतोय की, अनेक तथाकथित नेते म्हणतात की, हे लोक जमले का? यांची बैठक कशी काय घेतली? अरे लोकशाहीमध्ये बैठक घ्यायला परवानगी नाही का? भाजपचे राज्याचे अध्यक्ष त्यांचं नाव माझ्या लक्षात नाही. त्यांचं एक विधान आलं की, या बैठकांची गरज काय होती? दुसऱ्या दिवशी त्यांचं आणखी एक विधान आलं की, मुंबईत त्यांच्या मित्रपक्षांची बैठक ते घेणार आहेत. अरे तुम्हाला बैठका घेता येतात आणि इतरांनी बैठका घेतल्या तर तुम्हाला चिंता का वाटते? माझ्या मते ज्याला मॅच्युअर पॉलिटिशियन असावे म्हणतात, त्याची कमतरता आहे, यापेक्षा जास्त सांगण्याची गरज नाही.

हेही वाचा >> Patna : 17 पक्ष, अजेंडा आणि… विरोधकांसमोर आहेत ‘ही’ मोठी आव्हानं

शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना काय दिलं उत्तर?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की, “एकनाथ शिंदेंनी केली तर गद्दारी आणि पवारांनी केली तर मुत्सद्देगिरी.” या विधानाला शरद पवारांनी उत्तर दिलं. ते म्हणाले, “कधी केली? त्यांनी सांगावं कधी केली? 1977 साली आम्ही सरकार बनवलं, पण त्यामध्ये भाजप माझ्याबरोबर होता. उत्तमराव पाटील… ही लहान (देवेंद्र फडणवीस) मुलं होती त्यावेळी. त्यामुळे त्यांना कळलं नसेल. त्यांना कदाचित पूर्वीचा इतिहास माहिती नसेल. पण, त्यांच्या माहितीसाठी सांगतो. मी जे सरकार बनवलं, ते सगळ्यांना सोबत घेऊन बनवलं. त्याच्यामध्ये त्यावेळचा जनसंघ. त्याचे उत्तमराव पाटील हे उपमुख्यमंत्री होते. त्याच्या नंतर आडवाणी होते. आणखी काही सदस्य होते.”

ADVERTISEMENT

हेही वाचा >> शरद पवारांच्या बेईमानीचा किस्सा अन् ठाकरेंना आव्हान, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“मला वाटतं की, हे (देवेंद्र फडणवीस) प्राथमिक शाळेत कदाचित असतील. त्यामुळे त्यांना त्या काळातील फारशी माहिती नसेल. आणि त्या अज्ञानापोटी ते असे स्टेटमेंट करतात. यापेक्षा जास्त काही भाष्य करायची गरज नाही”, असं म्हणत शरद पवारांनी फडणवीसांना टोला लगावला.

ADVERTISEMENT

अजित पवारांकडे कुठली जबाबदारी देणार? शरद पवार म्हणाले…

अजित पवारांनी पक्षातील जबाबदारी द्यावी अशी मागणी केलीये. शरद पवार म्हणाले, “असं आहे की, हा निर्णय कुणी एकटा घेत नाही. त्यांच्यासह प्रमुख लोक बसतील आणि त्यासंबंधीचा निर्णय घेतील. आज पक्ष संघटनेच्या कामात सगळ्यांनी लक्ष द्यावं अशी भावना आहे. तेच मत त्यांनी व्यक्त केलं. त्यापेक्षा वेगळं काही नाही.”

    follow whatsapp

    ADVERTISEMENT