राजीनाम्याबाबत शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय, अजितदादांनी सांगितला नेमका निरोप!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sharad Pawar has taken a big decision regarding resignation Ajit Pawar said
Sharad Pawar has taken a big decision regarding resignation Ajit Pawar said
social share
google news

मुंबई: राष्ट्र्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर मुंबईसह राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ माजली. शरद पवारांनी अचानक दिलेला हा धक्का अनेकांना अनपेक्षित होता. त्यामुळे राज्यभरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. तर दुसरीकडे मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. तर पवारांच्या निर्णयानंतर अनेक ज्येष्ठ नेत्यांनाही आपले अश्रू आवरले नाही. यामुळे या सगळ्या प्रतिक्रिया लक्षात घेऊन अखेर आता शरद पवार यांनी पुन्हा एक मोठा निर्णय घेतला आहे. (sharad pawar has taken a big decision regarding resignation what ajit Pawar said)

शरद पवार यांनी आपला निवृत्तीची निर्णय जाहीर केल्यानंतर यशवंतराव प्रतिष्ठानमधील सभागृहात मोठा ड्रामा पाहायला मिळाला. अनेक कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना त्यांचा निर्णय तात्काळ मागे घेण्याची विनंती केली. साधारण दोन तास हा सगळा प्रकार सुरू होता. पण घेतलेल्या निर्णयावर शरद पवार यांनी कोणतंही भाष्य न करता ते सिल्व्हर ओककडे रवाना झाले.

यानंतर राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी काही काळ बैठक केल्यानंतर हे सगळे नेते सिल्व्हर ओकवर रवाना झाले. इथे सर्व महत्त्वाच्या नेत्यांनी शरद पवार यांच्याशी तासभर चर्चा केली आणि त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. या चर्चेनंतर शरद पवार यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. जो सांगण्याची जबाबदारी ही अजित पवार यांच्यावर सोपविण्यात आली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

याचबाबत अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केलं की, ‘पवार साहेब म्हणाले की, तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर मला विचार करायला 2 ते 3 दिवस लागतील. मला दोन ते तीन दिवस द्या.’ म्हणजेच शरद पवार हे आपल्या राजीनाम्याच्या निर्णयावर तात्काळ निर्णय घेणार नसल्याचं सध्या तरी स्पष्ट झालं आहे.

पवार साहेब म्हणाले, मला विचार करायला 2-3 दिवस द्या: अजित पवार

‘आज 11 वाजता आपला जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमासाठी सर्व कार्यकर्ते साहेबांच्या प्रेमाखातर आलेले होते. आल्यानंतर कोणाच्याच लक्षात आलं नाही की, पवार साहेब असं काही बोलतील. तो सगळ्यांना एक प्रकारचा शॉक होता. तो शॉक बसल्यानंतर साहेब बराच वेळ आपल्या सगळ्यांसोबत बसले. नंतर पवार साहेब हे सिल्व्हर ओकला गेले. नंतर आम्ही काही लोकं बसलो. त्यानंतरही तुम्ही कार्यकर्ते इथून हलण्यासाठी तयार नाहीत. पवार साहेबांनी तुम्हाला फोन केला. तुम्हाला सुप्रियाने तो स्पिकरवर ठेवून ऐकवलाही.. तरी देखील आपण आपला हट्टीपणा सोडला नाही.’

ADVERTISEMENT

‘यानंतर आम्ही काही जणं.. त्यात विद्या चव्हाण असतील, वंदना चव्हाण असतील किंवा बाकीचे सगळे नेते सिल्व्हर ओकला गेले. इथे आम्ही सगळ्यांना सांगितलं की, सगळ्या महाराष्ट्राची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे की, आपण निर्णय मागे घ्यावा.’

ADVERTISEMENT

‘मग त्यांनी मला त्यांनी, रोहितला आणि छगन भुजबळ साहेबांना सांगितलं. सुप्रियाशी काही गोष्टी ते फोनवरुन बोलले. आणि त्यांनी सांगितलं की, तुम्ही आता तिथे जाऊन माझा निरोप द्या. ते म्हणाले की, माझा निर्णय मी आता दिलेला आहे. परंतु तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर मला विचार करायला 2 ते 3 दिवस लागतील. मला दोन ते तीन दिवस द्या.’

‘आपण शेवटी साहेबांना दैवत मानतो. आपलं दैवतच म्हणतंय की, दोन-तीन दिवस द्या. मात्र, ते म्हणाले की, मी विचार केव्हा करेन तर इथले सगळे कार्यकर्ते आपआपल्या घरी निघून गेले तरच. ते म्हणाले तुम्ही आताही मला बसलेले दिसलात तर मी माझा निर्णय बदलणार नाही.’

‘तसंच उस्मानाबाद, बुलढाणा इथल्या जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिला. हे राजीनामा सत्र ताबडतोब थांबवलं गेलं पाहिजे. त्यांनी असंही सांगितलं की, मीडियाच्या मार्फत सगळ्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना आवाहन करा की, कोणीही राजीनामा देण्याचं कारण नाही. हे सगळं आम्ही पवार साहेबांशी तासभर चर्चा केली. पवार साहेब हे देखील म्हणाले की, माझ्यावर ते अवलंबून असतील तर त्यांनी माझं ऐकलंच पाहिजे.’ असं म्हणत अजित पवार यांनी शरद पवार यांचा नेमका निरोप मीडियाशी बोलताना सांगितला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT