‘गद्दारी झाली तेव्हा ठाकरेंना पहिला फोन सोनिया गांधींचा’, म्हणालेल्या तुम्ही…

मुंबई तक

ADVERTISEMENT

sonia gandhi made the first phone call to uddhav thackeray when eknath shinde rebelled said bhai jagtap
sonia gandhi made the first phone call to uddhav thackeray when eknath shinde rebelled said bhai jagtap
social share
google news

Sonia Gandhi first phone call to Uddhav Thackeray: मुंबई: ‘ज्या वेळेला या महाराष्ट्रात गद्दारी झाली त्यावेळेला सगळ्यात पहिला फोन सोनिया गांधींनी उद्धव ठाकरेंना केला आणि सांगितलं.. जे व्हायचं ते होऊ द्या. काँग्रेस आपल्यासोबत आहे आणि नेहमी आपल्यासोबत राहील.’ असं विधान काँग्रेसचे आमदार भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित वज्रमूठ सभेत बोलताना केलं आहे. यावेळी भाई जगताप यांनी म्हटलं की, जोवर भाजपचं सरकार घालवणार नाही तोवर महाआघाडी ही कायम राहील. (sonia gandhi made the first phone call to uddhav thackeray when eknath shinde rebelled said bhai jagtap)

व्रजमूठ सभेत भाई जगताप नेमकं काय म्हणाले?

‘कोणी भविष्य सांगितलं असतं की, शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येणार आहे तर कोणाचा विश्वास बसला नसता. परंतु आज परिस्थिती अशी आहे की, ज्या वेळेला छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला गिळंकृत करायचं पाप हे जे असैंविधानिक जे सरकार आहे ते करत आहे. अशा वेळेला आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनी निर्णय घेतला, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निर्णय घेतला.. काळाची गरज आहे.. आम्हाला एकत्र येण्याची गरजेचं आहे. राक्षसाच्या विरोधात लढणं गरजेचं आहे. म्हणून ही लढाई सुरू आहे. महाविकास आघाडी ही अशी तुटकीफुटकी नाही.’

हे ही वाचा>> ‘गौतमीचा कार्यक्रम ठेऊन अजित पवारांना….’,अब्दुल सत्तार यांच्या कानपिचक्या

‘एक गोष्ट या ठिकाणी मनापासून सांगतो. आदित्य यांनी इथे एक गोष्ट भावनिक होऊन सांगितली.. जी खरी आहे. की, ज्या वेळेला या महाराष्ट्रात गद्दारी झाली त्यावेळेला सगळ्यात पहिला फोन सोनिया गांधींनी उद्धव ठाकरेंना केला आणि सांगितलं.. जे व्हायचं ते होऊ द्या. काँग्रेस आपल्यासोबत आहे आणि नेहमी आपल्यासोबत राहील. हा विश्वास सोनिया गांधींनी पहिल्या दिवशी त्याठिकाणी दिला.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘आम्ही आश्वासित करू इच्छितो की, कदाचित उद्धवजींना आणि आमच्या नेत्यांना ही गोष्ट आता खरी वाटेल. ज्यांच्यासोबत 25 वर्ष सोयरिक केली त्यांनीच खंजीर खुपसलं तुमच्या पाठीत. यांची औलाद, औकात तीच आहे. यांचा इतिहास तोच आहे. काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादीचा इतिहास तो नाही. आम्ही ज्यावेळेला खांद्याला खांदा देऊन काम करू असं सांगतो,.. तेव्हा शेवटपर्यंत आपण एकत्र राहणार आहोत.’ असं भाई जगताप यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> ”गौतमी पाटील बैलासमोर नाचो, नाहीतर…”, अजित पवारांची तुफान फटकेबाजी

वज्रमूठ सभेतून विरोधकांचा भाजपविरोधात एल्गार

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमध्ये जाऊन महाविकास आघाडीचे नेते वज्रमूठ सभा घेत आहेत. या सभांच्या माध्यमातून महाविकास आघाडी ही शिंदे-फडणवीस सरकार विरोधात रणशिंग फुंकत आहे. या सभांमधून विरोधक सातत्याने सरकारवर घणाघाती टीका करत आहेत.

ADVERTISEMENT

मुंबईच्या वज्रमूठ सभेत अजित पवारही भाषण करणार

दरम्यान, वज्रमूठ सभेत तीन पक्षातील दोन-दोन नेते भाषणं करतात. त्यामुळेच नागपूरच्या वज्रमूठ सभेत अजित पवार यांनी भाषण न केल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, आता अजित पवार हे मुंबईतील सभेत भाषण करणार असल्याचं समजतं आहे. त्यामुळे या सभेत अजित पवार नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT