'यांचा छिछोरपणा सैन्याचं मनोबल खच्ची करत होते', PM मोदी काँग्रेसवर संतापले
PM Modi Loksabha Speech: ऑपरेशन सिंदूरवर लोकसभेत जी चर्चा झाली त्यावर पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर बराच संताप व्यक्त केला. पाहा मोदी नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मागील 2 दिवसांपासून ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू आहे. याच चर्चेला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभेत आले. जिथे आपल्या भाषणादरम्यान, काँग्रेस आणि विरोधकांवर संतापलेले दिसून आले.
'पहलगामच्या निर्दोष लोकांच्या हत्येत देखील ते आपलं राजकारण शोधत होते. आपल्या स्वार्थी राजकारणासाठी माझ्यावर निशाणा साधत होते. पण त्यांची ही टीकाटिप्पणी, यांचं छिछोरपणा.. देशाच्या सुरक्षा दलाचं मनोबल कमी करत होतं.' असं म्हणत PM मोदींनी यावेळी बराच संताप व्यक्त केला.
पाहा लोकसभेत पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले
'ऑपरेशन सिंदूर जगाचं समर्थन मिळालं, अनेक देशांनी समर्थन केलं. पण हे दुर्भाग्य आहे की, माझ्या देशातील वीरांच्या पराक्रमाला काँग्रेसचं समर्थन नाही. 22 एप्रिलच्या दहशतवादी हल्ल्याच्या 3-4 दिवसानंतरच हे उड्या मारत होते. असं म्हणायला लागले की, कुठे गेली 56 इंचांची छाती? कुठे गेला मोदी? मोदी तर फेल झाला.. काय मजा घेत होते.'
हे ही वाचा>> 'दम असेल तर PM मोदींनी म्हणावं ट्रम्प खोटारडे आहेत..', राहुल गांधींचं थेट आव्हान
'त्यांना वाटत होतं की, बाजी मारली.. त्यांना पहलगामच्या निर्दोष लोकांच्या हत्येत देखील ते आपलं राजकारण शोधत होते. आपल्या स्वार्थी राजकारणासाठी माझ्यावर निशाणा साधत होते. पण त्यांची ही टीकाटिप्पणी, यांचं छिछोरपणा.. देशाच्या सुरक्षा दलाचं मनोबल कमी करत होतं.'
'यांना ना भारताच्या सामर्थ्यावर भरोसा आहे, ना यांना भारताच्या सैन्यावर भरोसा आहे. म्हणून ते सततत ऑपरेशन सिंदूरवर सवाल उपस्थित करत आहेत. असं करून तुम्ही मीडियामध्ये हेडलाइन्स तर घेऊ शकतात. पण, देशावासियांच्या मनात स्थान मिळवू शकत नाहीत.'