Exculsive: 'फडणवीस, बावनकुळेंसाठी 'हा' इशारा पुरेसा', किरीट सोमय्या एवढं थेट बोलले अन्...

मुंबई तक

Kirit Somaiya on Devendra Fadnavis: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना पुन्हा एकदा थेट इशारा दिला आहे.

ADVERTISEMENT

'फडणवीस, बावनकुळेंसाठी 'हा' इशारा पुरेसा'
'फडणवीस, बावनकुळेंसाठी 'हा' इशारा पुरेसा'
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'कोणाचा अपमान करण्याचा ना फडणवीसांना अधिकार आहे ना बावनकुळे यांना'

point

किरीट सोमय्या पुन्हा एकदा स्पष्टच बोलले

point

भाजपमध्ये नेमकं काय चाललंय?

Kirit Somaiya Exclusive Interview: दिपेश त्रिपाठी, मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांना निवडणुकी व्यवस्थापन समितीत घेण्यात आल्यानंतर त्यांनी एक पत्र लिहून प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. कोणतीही चर्चा न करता अशी नियुक्ती करणं हा अपमान आहे. असं खरमरीत पत्र सोमय्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लिहिलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा सोमय्या यांनी एक मोठं विधान केलं आहे. (this warning is enough for devendra fadnavis and chandrasekhar bawankule kirit somaiya speaks directly)

मुंबई Tak सोबत Exculsive बातचीत करताना किरीट सोमय्या यांनी थेट देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना खडे बोल सुनावले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंना काल दिलेला इशारा पुरेसा आहे. असं म्हणत पुन्हा एकदा सोमय्यांनी फडणवीस आणि बावनकुळेंवर निशाणा साधला.

हे ही वाचा>> Kirit Somaiya: 'अशी अवमानास्पद वागणूक देऊ नका', किरीट सोमय्यांचा लेटरबॉम्ब... भाजपमध्ये मोठी खळबळ

'फडणवीस, बावनकुळेंना अपमान करण्याचा अधिकार नाही...', पाहा सोमय्या नेमकं काय म्हणाले

प्रश्न: तुम्हाला काल समितीत घेतलं होतं, पण तुम्ही पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. हे संपूर्ण प्रकरण काय आहे?

किरीट सोमय्या: कधी-कधी आमचे महाराष्ट्रातील जे काही 2-4 मुख्य नेते आहेत त्यांना आम्हाला जागं करावं लागतं की,  कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत ते बघा.. ती लोकं कधी-कधी वाहवत जातात किंवा भटकतात... त्यांना जागेवर आणावं लागतं.. काल मी तेच काम केलंय की, याप्रकारे कोणाचा अपमान करण्याचा ना फडणवीसांना अधिकार आहे ना बावनकुळे यांना आहे. 

कार्यकर्ता हा जमिनीवर चालतो.. मी देखील एक कार्यकर्ता आहे. 18 फेब्रुवारी 2019 ला पक्षाने मला सांगितलं की, उद्धव ठाकरेंसोबत समझोता करायचा आहे आणि त्यामुळे तुम्हाला बलिदान द्यायचं आहे. मी बलिदान दिलं. मी सामान्य कार्यकर्ता म्हणून माझा जीव तळहातावर घेऊन काम करतो. करत राहीन... विधानसभा निवडणुकीत देखील महायुती सरकारसाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावीन.

हे वाचलं का?

    follow whatsapp