Maharashtra : ‘राज ठाकरेंना फोन करणार, पण…’, उद्धव ठाकरे खासगीत काय बोलले?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करण्याबद्दल विधान केले. राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार, या चर्चेने पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. त्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उत्तर दिले आहे.
ADVERTISEMENT

Uddhav Thackeray-Raj Thackeray : राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार, या चर्चेने पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. याला कारण ठरलंय उद्धव ठाकरेंचं एक विधान. पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राज ठाकरेंना फोन उचलायला तयार असतील, फोन करणार.’ ठाकरेंच्या या विधानावर मनसेकडून तिखट प्रतिक्रिया आलीये.
पत्रकारांशी अनपौचारिक बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मी राज ठाकरेंना फोन करण्यास तयार आहे. वेळ आल्यास बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात राज ठाकरेंशी बोलणार. राज फोन उचलायला तयार असतील, तर फोन करणार.”
उद्धव ठाकरेंच्या विधानावर मनसेची भूमिका काय?
राज ठाकरेंनी फोन उचलला, तर करणार या उद्धव ठाकरेंच्या विधावर संदीप देशपांडे यांनी टीव्ही9 ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की, “फोन उचलायला तयार असतील, तर फोन करणार याचा अर्थच मला कळला नाही. जे लोक स्वतः इतरांचे फोन उचलत नाहीत, त्यांच्याच मनात ही भीती असू शकते. जर मला वाटलं की फोन करावा, तर मी हा विचार करणार नाही की उचलेल की नाही.”
वाचा >> ‘चक्की पिसिंग.. पिसिंग..’ आता देवेंद्र फडणवीसांना संभाजीराजेंनीही डिवचलं!
श्रीकांत ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंची भाषणं रेकॉर्ड केलेली आहेत. ती उद्धव ठाकरेंना हवी आहेत. त्यामुळे त्यांना (उद्धव ठाकरे) खात्री हवीये की, फोन केल्यानंतर राज ठाकरेंनी तो उचलावा. त्यावर संदीप देशपांडे म्हणाले की, “असं डोक्यातच का आलं. असं कुणाच्या मनात येऊ शकतं, जे स्वतः लोकांचे फोन उचलत नाही, त्यांच्याच मनात या गोष्टी येऊ शकतात. मी याचा उचलला नव्हता, तर हा माझा उचलेल का?”, असा उलट सवाल देशपांडेंनी उपस्थित केला.