Congress: 'शिवसेनेसोबत आपल्याला..', राहुल गांधींच मोठं विधान; काँग्रेसच्या बैठकीतील Inside Story
Rahul Gandhi on Shiv Sena UBT: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांसोबत तब्बल २ तास चर्चा केली. ज्यामध्ये राहुल गांधी एक मोठं विधान केलं आहे.
ADVERTISEMENT

Rahul Gandhi: नवी दिल्ली: एकीकडे राजधानी दिल्लीत लोकसभेचं अधिवेशन सुरू असताना दुसरीकडे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांसोबत तब्बल २ तास चर्चा केली. या बैठकीत राहुल गांधींनी काही अत्यंत महत्त्वाची विधानं यावेळी केली. यावेळी शिवसेना (UBT) पक्षासोबत असलेल्या युतीविषयी देखील राहुल गांधींनी महत्त्वाचं वक्तव्य करत महाराष्ट्र काँग्रेसमधील नेत्यांचे कानही टोचले.
काँग्रेसच्या बैठकीत नेमकं काय-काय घडलं? वाचा बैठकीतील Exclusive माहिती
राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांसोबत आज जी बैठक झाली ती तब्बल २ तास सुरु होती. या बैठकीत अनेक नेत्यांनी असा सूर लावला की,जी लोकं काँग्रेस सोडून गेले आहेत त्यांना आता पुन्हा पक्षात घेऊ नका.
याच बैठकीत राहुल गांधी असं म्हणाले की, बेशिस्तपणा पक्षात खपवून घेतला जाणार नाही. यावेळी राहुल गांधींनी अशोक चव्हाण यांचे उदाहरण दिले.आता ते भाजपमध्ये असूनही कुठेच नाहीत,नांदेडमध्ये भाजपचा पराभव झाला आणि अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये मान नाही. असंही ते यावेळी म्हणाले.त्यामुळे काही बाबतीत सीमारेषा आखल्या गेल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले.
हे ही वाचा>> MVA : मविआचा जागावाटपासाठी 'हा' फॉर्म्युला?; ठाकरे-पवारांच्या पक्षाला किती जागा?
याशिवाय महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांनी संजय निरुपम यांचे उदाहरण दिले.त्यांनी जाहीर वक्तव्ये करण्यास सुरुवात केल्यावर त्यांना काढून टाकण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले.