Pahalgam Attack: 'चुन-चुनकर मारेंगे', अमित शाह पहिल्यांदाच बोलले एवढं स्पष्ट; मोठं काही तरी घडणार?

मुंबई तक

'हर आतंकी को चुन-चुनकर मारेंगे' असं मोठं वक्तव्य अमित शाह यांनी केलं आहे. पहिल्यांदाच त्यांनी असं विधान जाहीरपणे केलं आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

नवी दिल्ली: 'पहलगाम हल्ल्याचा शोधून-शोधून बदला घेतला जाईल. हा नरेंद्र मोदींचा भारत आहे.' असं मोठं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी (1 मे) दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना केलं आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर पावले उचलली आहेत.

अमित शाह म्हणाले, 'आज कोणीही असे समजू नये की आपल्या 27 लोकांना मारून त्यांनी ही लढाई जिंकली आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की प्रत्येक व्यक्तीला उत्तर मिळेल. जर कोणी भ्याड हल्ला केला आणि त्याला वाटत असेल की हा आपला विजय आहे, तर त्याने हे समजून घेतले पाहिजे की शोधून-शोधून बदला (चुन-चुन कर बदला लिया जायेगा) घेतला जाईल. हा नरेंद्र मोदींचा भारत आहे.'

'जगातील सर्व देश आज भारतासोबत उभे आहेत'

गृहमंत्री म्हणाले, 'आज पुन्हा एकदा मी या संकल्पाची आठवण करून देऊ इच्छितो की दहशतवादाविरुद्धची आपली लढाई सुरूच राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, डाव्या विचारसरणीचा अतिरेकीपणा असो किंवा काश्मीरचा मुद्दा असो, जर कोणी भ्याड कृत्य केले तर कोणालाही सोडले जाणार नाही.'

अमित शाह म्हणाले की, 'प्रत्येक जमिनीच्या प्रत्येक इंचावरून दहशतवादाचा नायनाट केला जाईल. जगातील सर्व देश दहशतवादाविरुद्ध भारतासोबत एकत्र आले आहेत आणि उभे राहिले आहेत. दहशतवाद संपेपर्यंत त्यांना शिक्षा दिली जाईल.'

हे वाचलं का?