एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंनाच म्हणाले… माझ्याकडे 35 आमदार, विचार करा आणि मला काय ते सांगा!

मुंबई तक

मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी 35 आमदारांच्या जोरावर महाविकास आघाडी सरकारविरोधात बंडाचा झेंडा फडकवला आहे. ज्यामुळे शिवसेनेत मोठी उलथापालथ झाली आहे. या सगळ्या प्रकरणात आता सगळ्यात मोठी बातमी आता समोर आली आहे. ती म्हणजे, एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरुन तब्बल 20 मिनिटं फोनवर बातचीत झाली. यावेळी एकनाथ शिंदेंनी थेट अल्टिमेटमच दिला […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी 35 आमदारांच्या जोरावर महाविकास आघाडी सरकारविरोधात बंडाचा झेंडा फडकवला आहे. ज्यामुळे शिवसेनेत मोठी उलथापालथ झाली आहे. या सगळ्या प्रकरणात आता सगळ्यात मोठी बातमी आता समोर आली आहे. ती म्हणजे, एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरुन तब्बल 20 मिनिटं फोनवर बातचीत झाली. यावेळी एकनाथ शिंदेंनी थेट अल्टिमेटमच दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी थेट सूरतमध्ये जाऊन एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. चर्चेनंतर नार्वेकर यांनी आपल्या फोनवरुनच एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं करुन दिलं. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं की, ‘माझ्याकडे 35 आमदार आहेत. त्यामुळे जर आपण भाजपसोबत सत्ता स्थापन करणार असाल तर पक्ष फुटणार नाही. यावर विचार करा आणि मला काय ते सांगा.’ असा अल्टिमेटमच एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

एकनाथ शिंदे-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरुन नेमकी काय चर्चा झाली?

मिंलिद नार्वेकर यांनी थेट सूरतमधील ला मेरिडियन हॉटेल गाठून एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. यानंतर नार्वेकर यांनी आपल्या फोनवरुन मुख्यमंत्र्यांशी एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं करुन दिलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp