New Parliament building : नेहरू ते मोदी अन् राजदंड; इतिहास काय, इतकं महत्त्व का?

मुंबई तक

नव्या संसद भवनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून, यावेळी राजदंडही बसवण्यात येणार आहे. काय आहे त्याचा इतिहास?

ADVERTISEMENT

The new Parliament building will be inaugurated by Prime Minister Narendra Modi, and the scepter will also be installed on this occasion. What is Sengol?
The new Parliament building will be inaugurated by Prime Minister Narendra Modi, and the scepter will also be installed on this occasion. What is Sengol?
social share
google news

what is Sengol : भारताच्या नव्या संसद भवनाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 मे रोजी उद्घाटन करतील. त्यावेळी सत्ता आणि न्यायाचं प्रतिक असलेल्या एका ऐतिहासिक वस्तूंचा उल्लेख होईल. 75 वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा धागा याला जोडलेला असेल, तो म्हणजे राजदंडाचा! 14 ऑगस्ट 1947 च्या रात्री लॉर्ड माऊंटबॅटन यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हाती राजदंड सोपवला अन् भारतीयांनी मोकळा श्वास घेतला. राजदंडाबद्दल आता सांगण्याचं कारण म्हणजे नव्या संसद भवनात खास राजदंड बसवला जाणार आहे. त्याचाच इतिहास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितला.

अमित शाह म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात निश्चित केलेल्या उद्दिष्टांपैकी आपल्या ऐतिहासिक परंपरांचा आदर करणे आणि त्यांचे पुनर्जागरण हे एक ध्येय होते.’ राजदंडाशी संबंधित गोष्ट सांगताना अमित शाह म्हणाले की, ही घटना स्वातंत्र्याच्या क्षणाशी संबंधित आहे. ते म्हणाले की, ’14 ऑगस्ट 1947 च्या रात्री एक महत्त्वाची ऐतिहासिक घटना घडली. आज 75 वर्षांनंतरही देशातील बहुतांश नागरिकांना याची माहिती नाही. राजदंडाने आपल्या इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हा राजदंड ब्रिटिशांकडून भारतीयांना सत्ता सुपूर्द केल्याचं प्रतीक आहे.

शाहांनी हाच धागा धरून पुढे सांगितल की, ‘या घटनेचे ऐतिहासिक महत्त्व जाणून घेतल्यानंतर तुम्हा सर्वांना आश्चर्य वाटेल की, ही माहिती आजपर्यंत देशासमोर का आली नाही? यानंतर हा गौरव सोहळा देशासमोर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.’

14 ऑगस्ट 1947 च्या रात्री काय घडलं होतं, अमित शाहांनी सांगितला इतिहास

’14 ऑगस्ट 1947 च्या रात्री 10.45 मिनिटांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तामिळनाडूहून आलेल्या विद्वानांकडून हा राजदंड स्वीकारला होता. इंग्रजांकडून सत्ता मिळवल्याचे प्रतीक म्हणून त्यांनी ते संपूर्ण विधींसह स्वीकारला होता. पंडित नेहरूंनी 14 ऑगस्ट 1947 च्या रात्री अनेक नेत्यांच्या उपस्थितीत हा राजदंड स्वीकारून स्वीकारून सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण केली होती’, असं शाह यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp