टीम इंडियातून लवकर गायब झालेले हे ५ खेळाडू माहित आहेत का?

मुंबई तक

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व करायचं असं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. यासाठी भारतात प्रत्येक क्रिकेटपटू हा रणजी, आयपीएल संघात स्थान मिळतं का यासाठी प्रयत्नशील असतो. काही खेळाडूंना स्थानिक स्पर्धेत केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात संधी मिळतेही. अनेकदा काही खेळाडू आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवत संघातलं आपलं स्थान पक्क करतात. मात्र काही खेळाडूंच्या पदरात अपयश […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व करायचं असं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. यासाठी भारतात प्रत्येक क्रिकेटपटू हा रणजी, आयपीएल संघात स्थान मिळतं का यासाठी प्रयत्नशील असतो. काही खेळाडूंना स्थानिक स्पर्धेत केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात संधी मिळतेही. अनेकदा काही खेळाडू आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवत संघातलं आपलं स्थान पक्क करतात. मात्र काही खेळाडूंच्या पदरात अपयश येतं.

अनेकांना ठराविक संधीनंतर मग पुन्हा भारतीय संघाची दारं उघडली जात नाहीत. आज आपण भारतीय संघाकडून केवळ एक सामना खेळून गायब झालेल्या खेळाडूंची माहिती घेणार आहोत.

५) फैज फजल – काही वर्षांपूर्वी स्थानिक क्रिकेट, देवधर ट्रॉफी आणि इंडिया A संघाकडून खेळताना फजलने आपली छाप पाडली होती. मुंबईविरुद्ध इराणी ट्रॉफीत खेळत असताना फैजने केलेल्या खेळीमुळे त्याने निवड समितीचं लक्षही वेधून घेतलं. या जोरावर त्याची झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत भारतीय संघात निवडही झाली. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचीही धडाक्यात सुरुवात करत फैज फजलने पहिल्याच सामन्यात हाफ सेंच्युरी झळकावली. मात्र दुर्दैवाने हा त्याचा पहिला आणि शेवटचा सामना ठरला. सिनीअर खेळाडूंच्या अनुपस्थितीत दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात नवीन खेळाडूंनी संधी दिली आणि मग फजल संघाबाहेरच गेला.

४) श्रीनाथ अरविंद – कर्नाटककडून स्थानिक क्रिकेट खेळणारा श्रीनाथ अरविंद उमदा गोलंदाज…२००८-०९ मध्ये अरविंदने कर्नाटककडून खेळायला सुरुवात केली. स्थानिक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर २०११ मध्ये अरविंदला आयपीएलमध्ये RCB ने संधी दिली. या सिझनमध्ये त्याने १४ सामन्यांत २१ विकेट्स घेत सर्वांना आश्चर्यचकीत केलं. याच वर्षी अरविंदची इंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी संघात निवड झाली. परंतू दुखापतीमुळे त्याला स्थान गमवावं लागलं. यानंतर थेट २०१५ साली रणजी क्रिकेटमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीनंतर श्रीनाथ अरविंदला दक्षिण आफ्रिकेविरोधात टी-२० मालिकेत संधी मिळाली. मात्र या सामन्यात त्याची चांगलीच धुलाई झाली. ३.४ ओव्हरमध्ये ४४ रन्स देत अरविंदने एक विकेट घेतली. यानंतर अरविंदची एकदाही भारतीय संघात निवड झाली नाही.

हे वाचलं का?

    follow whatsapp