मान्सूनचं नेमकं गडलंय तरी काय... या 'अल-निनो'नेच केलाय सगळा घोळ?
जुलैच्या सुरुवातीला मुसळधार पाऊस झाला पण त्यानंतर तब्बल 10 दिवसांची विश्रांती पावसाने घेतली. महाराष्ट्रातील मान्सून कमकुवत होण्यामागे अल-निनो आहे की इतर हवामान प्रणाली जबाबदार आहे? हेच आपण समजून घेऊया.
ADVERTISEMENT

El Nino Maharashtra: जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात महाराष्ट्रात मान्सूनने जोरदार हजेरी लावली होती. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे घाटमाथा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक रस्ते बंद झाले, वाहतूक विस्कळीत झाली आणि जनजीवनावर मोठा परिणाम झाला. मात्र, त्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली. गेल्या दहा दिवसांहून अधिक काळ राज्यातील बहुतांश भागात पावसाने विश्रांती घेतली आहे. तुरळक सरी वगळता व्यापक स्वरूपाचा पाऊस होत नसल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांचीही चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर एक प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. महाराष्ट्रात पाऊस कमी होण्यामागे अल-निनो (El Nino)जबाबदार आहे का?
अल-निनो म्हणजे नेमकं काय?
अल-निनो ही प्रशांत महासागराच्या (Pacific Ocean) विषुववृत्तीय भागात समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढण्याची नैसर्गिक हवामान प्रक्रिया आहे.
हे ही वाचा>> अल-निनो असतानाही एवढा पाऊस का पडतोय? महाराष्ट्रात अचानक पावसाचा कहर
समुद्राचे तापमान वाढल्यामुळे जगभरातील वाऱ्यांचे स्वरूप, आर्द्रतेचा प्रवाह आणि मान्सूनची दिशा बदलू शकते. भारतासह अनेक देशांमध्ये याचा परिणाम पावसावर होतो.
इतिहास पाहिला तर अनेक अल-निनो वर्षांमध्ये भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस नोंदवला गेला आहे. मात्र प्रत्येक वेळी अल-निनोचा परिणाम सारखाच होतो, असे नाही.










