लठ्ठपणावरुन टोमणे आणि पैशांची मागणी... स्टाफ नर्सची निर्घृण हत्या

मुंबई तक

एका स्टाफ नर्सची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. लग्नानंतर तिला काही दिवसांतच हुंडा, लठ्ठपणा आणि अपत्य न होणे या कारणांवरून सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागत होता. धारवाडमधील ही घटना आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

लठ्ठपणावरुन टोमणे आणि पैशांची मागणी...

point

स्टाफ नर्सची निर्घृण हत्या

Crime News : कर्नाटकच्या धारवाडमधून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. येथे 29 वर्षीय  स्टाफ नर्स प्रियांका कमलाकर यांची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना त्यांच्या पतीनेच घडवून आणल्याचा आरोप आहे. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच प्रियांका यांना हुंडा, लठ्ठपणा आणि अपत्य न होणे या कारणांवरून सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागत होता. या अत्यंत गंभीर प्रकरणी कारवाई करत पोलिसांनी पतीसह चार जणांना अटक केली आहे.

लग्नानंतर एका महिन्यातच छळ

मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांका कमलाकर यांचा विवाह 13 डिसेंबर 2024 रोजी धारवाड जिल्ह्यातील नवलगुंड तालुक्यातील हनासी गावचे रहिवासी बसवराज यांच्याशी झाला होता. एफआयआरनुसार, लग्नानंतर अवघ्या एका महिन्यातच पती आणि त्याच्या कुटुंबीयांनी प्रियांका यांचा छळ सुरू केला. सासरचे लोक प्रियांका यांच्यावर माहेरहून सोन्याचे दागिने आणि पैसे आणण्यासाठी सतत दबाव टाकत होते. तसेच प्रियांका यांच्या नोकरीचा पगारही सासरच्या लोकांकडून मागितला जात होता, ज्याचा त्यांच्या वैवाहिक जीवनावर अत्यंत वाईट परिणाम होत होता.

हे ही वाचा : एड्स बाधित महिलेवर कथित बलात्कार, न्यायालयाने आरोपीला निर्दोष सोडताना कोणती कारणं दिली?

'तू माझ्या मुलापेक्षा जाड आहेस'

प्रियांका यांच्या माहेरच्या लोकांनी आरोप केला आहे की, पती बसवराज हा प्रियांका यांच्या वजनावरून आणि शारीरिक रचनेवरून सतत आक्षेपार्ह आणि अपमानकारक टिप्पण्या करायचा. 'तू माझ्या मुलापेक्षा जास्त जाड आहेस, तुझे शरीर खूप मोठे आहे, तू अजून गरोदर का झाली नाहीस?' अशा शब्दांत टोमणे मारून तिला मानसिक त्रास दिला जात होता. प्रियांका यांच्या काकांनी असाही दावा केला आहे की, प्रियांका दोनदा गरोदर राहिल्या होत्या, परंतु पतीच्या सततच्या मारहाणीमुळे आणि छळामुळे दोन्ही वेळा त्यांचा गर्भपात झाला होता.

हे ही वाचा : 'जेव्हा प्रेमाची गरज होती, तेव्हा प्रेमभंग केला..' मुंबई Tak बैठकीत CM फडणवीसांचे ठाकरेंना टोल्यांवर टोले!

चौघांना अटक

अखेर सोमवारच्या (29 जून) रात्री पती बसवराज याने प्रियांका यांची गळा आवळून हत्या केली. या घटनेची माहिती दोन दिवसांनंतर समोर आली, ज्याची दखल घेत नवलगुंड पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवली. पोलिसांनी पती बसवराज यांच्यासह रेनव्व्हा, सुभाष आणि सिद्धरामेश या चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेने देशातील कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळी आणि महिलांच्या शारीरिक रचनेवरून केल्या जाणाऱ्या भेदभावाचा अत्यंत क्रूर चेहरा पुन्हा एकदा समोर आणला असून प्रियांका यांच्या कुटुंबीयांनी आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली आहे.
 

हे वाचलं का?