लग्नानंतर प्रियकराशी बोलत राहिली, नको नको ते सांगत राहिली... सोनमचे 'ते' चॅट्स समोर

मुंबई तक

पोलीस तपासात सोनम आणि राज कुशवाह यांच्यातील चॅट्स समोर आल्या आहेत. त्यांनी हत्येची संपूर्ण कट आखल्याचं यातून स्पष्ट झालं आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज कुशवाहसोबत काय काय बोलायची सोनम?

point

राजा रघुवंशी प्रकरणात मोठा खुलासा

point

कट कसा रचला, ते सुद्धा समोर आलं...

Raja and Sonam Honeymoon Case : इंदोरमधील राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी प्रकरणाने देशभरात खळबळ माजली आहे. दोघांच्याही लग्नाला अवघे तीन दिवस झाले होते. लग्नानंतर हनीमूनसाठी मेघालयला गेलेल्या राजाची पत्नी सोनम आणि तिचा प्रेमी राज कुशवाह यांनी मिळून त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सोनमने यूपीच्या गाझीपूर येथे पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे.

लग्नानंतर राजाने सोनमशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला, पण सोनमला हे मान्य नव्हतं. तिच्या मनात राजा नाही, तर राज कुशवाह होता. सोनम लग्नानंतरही राज कुशवाह याच्याशी सतत संपर्कात होती. तिने चॅटद्वारे राज कुशवाहला सांगितलं की, राजा माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतोय आणि मला ते आवडत नाहीयेय यानंतर दोघांनी मिळून राजाचा काटा काढण्याचा कट रचला.

हे ही वाचा >> "खचून जाऊ नका...", हॉटेल भाग्यश्रीची तोडफोड, हॉटेल तिरंगाच्या मालकाचा सपोर्ट, म्हणाले...

लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच सोनम आणि राज कुशवाह यांनी हत्येची योजना आखली. मेघालय हे ठिकाण निवडण्याचं कारण म्हणजे दुर्गम भागात असलेलं लोकेशन. भाडोत्री मारेकऱ्चांना सुपारी दिली आणि सोनमने राजाला हनीमूनच्या बहाण्याने राजाला मेघालयला नेलं. तिथे राजाची हत्या करण्यात आली. या प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.

पोलीस तपासात सोनम आणि राज कुशवाह यांच्यातील चॅट्स समोर आल्या आहेत. त्यांनी हत्येची संपूर्ण कट आखल्याचं यातून स्पष्ट झालं आहे. सोनमने राजाला पतीच्या प्रत्येक हालचालीची माहिती दिली. या चॅट्समधून सोनमच्या मनात राजाबद्दल असलेली नाराजी आणि प्रेमी राज कुशवाह याच्याशी असलेलं नातं उघड झालं.

हे ही वाचा >> सोनमने प्रॉपर प्लॅन केला, प्रियकराला इंदोरमध्येच थांबवून मारेकऱ्यांना... पोलीस चौकशीत मोठा खुलासा

सोनमने गाझीपूरमध्ये आत्मसमर्पण केल्यानंतर पोलिसांनी तिचा प्रेमी राज कुशवाह यालाही ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असल्याचा संशय आहे. पोलीस या हत्येच्या कटाचा सखोल तपास करत असून, भाडोत्री गुंडांचा शोध घेत आहेत.

 

हे वाचलं का?

    follow whatsapp