बापानं ‘ती’ गोष्ट खरी केलीच, दोन चिमुकल्यांची हत्या करत स्वत: संपवलं जीवन

मुंबई तक

विकास राजूरकर, प्रतिनिधी, चंद्रपूर महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यात हृहय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. बापानेच आपल्या दोन मुलांची विष देऊन हत्या केली आहे. वडिलांनी मानसिक तणाव आणि आर्थिक विवंचनेला कंटाळून हे कृत्य केलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे वडिलांनी स्वत: आत्महत्या करुन आपलं जीवन संपवलं आहे. घटनास्थळावर एक चिठ्ठी देखील सापडली आहे त्यामध्ये या सर्व गोष्टी समोर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

विकास राजूरकर, प्रतिनिधी, चंद्रपूर

महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यात हृहय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. बापानेच आपल्या दोन मुलांची विष देऊन हत्या केली आहे. वडिलांनी मानसिक तणाव आणि आर्थिक विवंचनेला कंटाळून हे कृत्य केलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे वडिलांनी स्वत: आत्महत्या करुन आपलं जीवन संपवलं आहे. घटनास्थळावर एक चिठ्ठी देखील सापडली आहे त्यामध्ये या सर्व गोष्टी समोर आल्या आहेत.

आर्थिक विवंचनेतून संपवलं चिमुकल्यांचं जीवन

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात शरीर सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. वरोरा तालुक्यातील बोर्डा गावात एका बापाने आपल्या दोन निष्पाप मुलांची विष पाजून हत्या केली, त्यानंतर बाप वर्धा येथे घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. 3 वर्षांची मुलगी मिष्टी कांबळे, 6 वर्षीय मुलगा सुमित कांबळे असं मृताचं नाव आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी वडिलांनी आर्थिक आणि मानसिक तणावाखाली ही घटना घडवली आहे, मुलांची नीट काळजी न घेतल्याने तो अनेकदा मुलांना मारल्याचीही चर्चा होती.

आरोपी वडील संजय कांबळे हे आर्थिक विवंचनेमुळे मानसिक तणावात राहायचे. ते खाजगी शिकवणी वर्ग चालवायचे. मात्र त्यांच्या मानसिक तणावामुळं मुलं शिकवणीत कमी शिकायला येऊ लागली, त्यामुळे पैसे मिळणं कमी झालं. त्यामुळं घर चालवणं कठीण झाले होते, अशा परिस्थितीत तो आणखीनच मानसिक तणावात राहू लागला. वडील संजयने आपल्या दोन निष्पाप मुलांना अत्यंत निर्दयीपणे विष देऊन ठार मारले, आणि घराला कुलूप लावले. त्यानंतर घटनास्थळावरून फरार झाला.

हे वाचलं का?

    follow whatsapp